Flight Engine Fire : नेपाळमध्ये विमानाला आग लागल्याने इमर्जन्सी लँडिंग

काठमांडू : नेपाळमधून एका मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे. बुद्ध एअरलाइन्सच्या विमानाला उड्डाण दरम्यान आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये आग लागली, त्यानंतर काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.या विमानामध्ये क्रू मेंबर्ससह ७६ प्रवासी होते.या अपघातात कोणी जखमी झाल्याची माहिती नाही.



मिळालेल्या माहितीनुसार, बुद्ध एअरचे विमान राजधानी काठमांडूपासून ४३ किलोमीटर पूर्वेला त्याच्या डाव्या इंजिनमध्ये आग लागल्याने उतरल्याचे वृत्त आहे. त्यानंतर ते एकाच इंजिनवर उड्डाण करून काठमांडूला परतले. त्यानंतर सकाळी ११.१५ वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर मॅन्युअल लँडिंग केले. विमानात क्रू मेंबर्ससह ७६ लोक होते. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या घटनेबाबत विमान कंपनीनेही निवेदन प्रसिद्ध केले आहे. विमानातील सर्व लोक सुरक्षित असल्याची माहिती दिली. विमानाला आग कशी लागली? याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रवाशांना दुसऱ्या विमानाने पाठवण्यात आले आहे.





बुद्ध एअरलाइन नेपाळची मोठी एअरलाइन कंपनी आहे. या एअरलाइनला २३ एप्रिल १९९६ ला सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त जज सुरेंद्र बहादुर बासनेट यांच्या मुलगा बिरेंद्र बहादुर यांनी ही एअरलाइन कंपनी सुरू केली आहे. ही कंपनी नेपाळमध्ये डोमेस्टिक सेवा देतात. या कंपनीची नेपाळमधील काठमांडू पासून भारतातील वाराणसीसाठी उड्डाण करतात.

Comments
Add Comment

ट्रम्पच्या नव्या निर्णयामुळे वाढली अमेरिका - इराण युद्धाची शक्यता

वॉशिंग्टन डीसी : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या निर्णयामुळे अमेरिका - इराण युद्धाची शक्यता वाढली आहे.

Pakistan Hockey Team: पाकिस्तानची पुन्हा नाचक्की; हॉटेलचे बिल न भरल्याने खेळाडू रस्त्यावर

पाकिस्तानी खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली आहे. खेळाडूंच्या हॉटेलचं बिल न भरल्याने खेळाडूंना

बांगलादेश निवडणुकीत बीएनपीचा विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा मार्ग बदलून टाकला आहे. बीएनपीने (बांगलादेश

Bangladesh: तारिक रहमानच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन होण्याची शक्यता

दिल्ली: बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर पार पडलेल्या ऐतिहासिक निवडणुकीत जनतेने तारिक रहमान यांच्या

आशिष शेलार युनेस्को मुख्यालयात

युनेस्को : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्को ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले

बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत ४७.९१ टक्के मतदान, मतमोजणीला सुरुवात

ढाका : बांगलादेशमध्ये २०२४ मध्ये मोठी दंगल उसळली आणि शेख हसीना यांनी देश सोडला. सध्या त्या भारतात सुरक्षित ठिकाणी