Life Mantra: चांगल्या कर्मांनी बदलू शकते का तुमचे नशीब?

मुंबई: अनेकदा तुम्ही लोकांना हे म्हणताना ऐकले असेल की नशिबात जे लिहिले आहे ते कोणीच बदलू शकत नाही. हे खरंच आहे की नशिबात जे काही असते ते कोणीच बदलू शकत नाही. कोणी मृत्यूच्या दाढेतूनही सहीसलामत परत येतो तर काहीजण आपला मृत्यू काही केल्या रोखू शकत नाही. हा सगळा नशिबाचा खेळ आहे. मात्र असे असले तरी तुम्ही कर्माबाबत ऐकलेच असेल. की कर्माचे फळ आपल्याला मिळते. चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच मिळते आणि वाईट कर्माचे फळ वाईट मिळते.


आयुष्याच्या या प्रवासात कर्म आणि नशीब ठरवतात की तुमचे जीवन कसे असेल. कर्म आणि नशीब एकमेकांच्या पूरक आहे. कर्माला नेहमी प्राधान्य दिले जाते. कर्म केल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही जीवनात यश मिळत नाही. जर तुम्हाला तुमचे नशीब चांगले करायचे असेल तर सुरूवात चांगल्या कर्मांनी झाली पाहिजे. जर तुम्ही एखाद्याची निस्वार्थ भावनेने मदत करत आहात, प्रत्येकाशी प्रेमाने बोलत आहात, कोणाच्या मजबुरीचा फायदा उचलत नाही आहात, सगळ्यांच्या वाईट काळात त्यांना साथ देत आहात तर तुम्ही चांगले कर्म करत आहात. हीच कर्म तुम्हाला तुमच्या वाईट काळात मदत करतात आणि देवही तुम्हाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढतो.


नशीबात लिहिलेले तुमच्या चांगल्या कर्माने बदलू शकते. त्यामुळे कधीही कोणाचेही मन दुखवू नका. लोक विचार करतात की जर आपण काही वाईट केले तर आपल्यासोबत आता चांगले होत आहे म्हणजेच कधीही वाईट होणार नाही. मात्र असे नाही. गेल्या जन्मातील चांगल्या कर्माची फळे तुम्हाला आज मिळत आहेत. मात्र जर तुम्ही आता वाईट केले तर कोणत्या ना कोणत्या जन्मात तुम्हाला त्याची शिक्षा मिळू शकते.


चांगल्या कर्मामुळे आपल्या जीवनाची दिशा आणि दशा ठरत असते. कर्म ही पुजेप्रमाणे असतात आणि त्यांना नेहमी पवित्र ठेवले पाहिजे. कर्म केल्याने शांतीपूर्ण मन आणि आत्मा मिळतो. तसेच सुखी जीवन प्राप्त होते.

Comments
Add Comment

सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरेंचा करिष्मा; मोहिते पाटील, जानकरांना जोरदार धक्का

मुंबई : सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रस्थापित नेत्यांना धक्का देत

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील महायुतीच्या तब्बल 27 जागा बिनविरोध, संपूर्ण यादी...

मुंबई: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यात कोणाची सत्ता येणार, कोण गुलाल उधळणार, कोण बाजी मारणार

जम्मू आणि हिमाचलमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता, हवामान खात्याने 'या' राज्यांना दिला इशारा

दिल्ली: हवामान खात्याने जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा दिला आहे. आयएमडीने

Dombivali: मानकोली उड्डाणपूल बनला रेसिंगचा अड्डा, नागरिकांच्या जीवाला धोका

डोंबिवली : डोंबिवलीमधील ठाणे आणि डोंबिवलीला जोडणारा मोठा गाव मानकोली उड्डाणपूल चार चाकी वाहनांच्या रेसिंगच्या

मुंबई विमानतळावर 'विश्वविजेत्या' युवा सेनेचे शाही स्वागत, स्वागताला चाहत्यांची अलोट गर्दी

मुंबई   : हरारेच्या मैदानावर तिरंगा फडकवून सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरणारा भारताचा युवा संघ आज मायदेशात दाखल

ऑडिटमध्ये एक दिवस उशीर झाल्यास ७५हजारांचा दंड, १ एप्रिलपासून नवीन नियम

मुंबई  : केंद्र सरकारने वित्त विधेयक २०२६ द्वारे कर नियम आणखी कडक करण्याचे संकेत दिले आहेत. विशेषतः ऑडिटशी