Life Mantra: चांगल्या कर्मांनी बदलू शकते का तुमचे नशीब?

मुंबई: अनेकदा तुम्ही लोकांना हे म्हणताना ऐकले असेल की नशिबात जे लिहिले आहे ते कोणीच बदलू शकत नाही. हे खरंच आहे की नशिबात जे काही असते ते कोणीच बदलू शकत नाही. कोणी मृत्यूच्या दाढेतूनही सहीसलामत परत येतो तर काहीजण आपला मृत्यू काही केल्या रोखू शकत नाही. हा सगळा नशिबाचा खेळ आहे. मात्र असे असले तरी तुम्ही कर्माबाबत ऐकलेच असेल. की कर्माचे फळ आपल्याला मिळते. चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच मिळते आणि वाईट कर्माचे फळ वाईट मिळते.


आयुष्याच्या या प्रवासात कर्म आणि नशीब ठरवतात की तुमचे जीवन कसे असेल. कर्म आणि नशीब एकमेकांच्या पूरक आहे. कर्माला नेहमी प्राधान्य दिले जाते. कर्म केल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही जीवनात यश मिळत नाही. जर तुम्हाला तुमचे नशीब चांगले करायचे असेल तर सुरूवात चांगल्या कर्मांनी झाली पाहिजे. जर तुम्ही एखाद्याची निस्वार्थ भावनेने मदत करत आहात, प्रत्येकाशी प्रेमाने बोलत आहात, कोणाच्या मजबुरीचा फायदा उचलत नाही आहात, सगळ्यांच्या वाईट काळात त्यांना साथ देत आहात तर तुम्ही चांगले कर्म करत आहात. हीच कर्म तुम्हाला तुमच्या वाईट काळात मदत करतात आणि देवही तुम्हाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढतो.


नशीबात लिहिलेले तुमच्या चांगल्या कर्माने बदलू शकते. त्यामुळे कधीही कोणाचेही मन दुखवू नका. लोक विचार करतात की जर आपण काही वाईट केले तर आपल्यासोबत आता चांगले होत आहे म्हणजेच कधीही वाईट होणार नाही. मात्र असे नाही. गेल्या जन्मातील चांगल्या कर्माची फळे तुम्हाला आज मिळत आहेत. मात्र जर तुम्ही आता वाईट केले तर कोणत्या ना कोणत्या जन्मात तुम्हाला त्याची शिक्षा मिळू शकते.


चांगल्या कर्मामुळे आपल्या जीवनाची दिशा आणि दशा ठरत असते. कर्म ही पुजेप्रमाणे असतात आणि त्यांना नेहमी पवित्र ठेवले पाहिजे. कर्म केल्याने शांतीपूर्ण मन आणि आत्मा मिळतो. तसेच सुखी जीवन प्राप्त होते.

Comments
Add Comment

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प

श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

तुळशी विवाह २०२५: जाणून घ्या या परंपरेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व!

मुंबई : हिंदू धर्मात तुळशी विवाह हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर तो घरगुती जीवनातील समृद्धी, आरोग्य आणि कुटुंबातील

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोटींचे ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यावर टाकली धाड, मुंबई पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी!

मुंबई: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्स कारखान्यावर छाप टाकत लाखोंचा माल जप्त करण्यात

सतीश शाह यांच्या निधनापूर्वी नक्की काय घडलं ? मॅनेजरने सांगितलं सत्य

मुंबई : हिंदी मालिका आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे काल शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या