DCM Eknath Shinde : एकही उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही


ठाणे : मागील सरकारच्या अडीच वर्षातील पहिल्याच सहा महिन्यात महाराष्ट्राला उद्योगात (Maharashtra Industry) एक नंबरला आणला. त्याआधीच्या लॉकडाऊन सरकारमुळे काही उद्योग राज्याबाहेर गेले. मात्र,यापुढे एकही उद्योग महाराष्ट्रातून जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यासंदर्भात संबंधित मंत्र्यांनी दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. ठाण्यात सुरू असलेल्या लक्षवेधच्या दोन दिवसीय 'बिझनेस जत्रा'चा (Business fair) समारोप एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत झाला.



त्यावेळी उपस्थित उद्योजकांना संबोधित करताना ते बोलत होते.३ ते ४ जानेवारी या कालावधीमध्ये आयोजित लक्षवेधच्या चौथ्या बिजनेस जत्रेमध्ये लघुउद्योजक तसेच व्यावसायिकांचे १५० च्या आसपास स्टॉल लागले होते. दोन दिवसात ९ हजार जणांनी भेट दिल्याची माहिती आयोजक अतुल राजोळी, गणेश दरेकर यांनी सांगितले. या बिझनेस जत्रेच्या समारोप दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन लघु उद्योजकांना उद्बोधक मार्गदर्शन केले. प्रारंभी "उद्योगाच्या घरी लक्ष्मी वास करी" "एकमेका साह्य करू...अवघे होऊ श्रीमंत" अशी कोटी करून, व्यवसायात प्रामाणिकपणा असला पाहिजे, कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. कुठलेही काम, कुठलीही संधी मिळाली की त्या संधीचे सोने करायचे. असा कानमंत्र उद्योजकांना दिला. मुख्यमंत्री असताना ज्या ज्या दुकाने, व्यवसायांची उद्घाटने केली. त्यांची व्यवसायात वृद्धी झाली. त्यामुळे खरं म्हणजे रॉयल्टी घ्यायला हवी होती. पण मी विदाऊट रॉयल्टी काम करणारा माणुस आहे. असे शिंदे यांनी स्पष्ट करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.


शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला. याची आठवण जागवताना ते काम फार कठीण होते, याची कबुली एकनाथ शिंदे यांनी देताना पूर्वीच्या सर्व बंद बंद करणाऱ्या लॉकडाऊन सरकारवर अनुल्लेखाने टिका केली.महायुतीचे सरकार असताना अडीच वर्षात एकही सुट्टी न घेणारा मुख्यमंत्री होतो. पहिल्या सहा महिन्यात महाराष्ट्राला उद्योगात नंबर एकला आणला. तेव्हा,उद्योगमंत्र्यांना सांगितले आहे की यापुढे एकही उद्योग महाराष्ट्रातुन जाता कामा नये. सर्वच मंत्र्यांना सांगितले आहे. जर उद्योग गेला तर तुमची योग्य ती काळजी मी घेईन. अशी जाहीर तंबीच एकनाथ शिंदे यांनी दिली.

Comments
Add Comment

Bangladesh Cricket Board : अखेर बांगलादेश नरमला; बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून भारताला आमंत्रण

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की,

Minister Nitesh Rane : मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र नंबर वन करणार - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : मत्स्यव्यवसायात राज्याला देशात अग्रस्थानी नेण्यासाठी राज्य शासनाने अनेक योजना, उपक्रम सुरू केले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Crime : थरारक! छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसा प्रेयसीची गळा चिरून हत्या; पेट्रोल पंपावरील घटनेने जिल्हा हादरला

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील करमाड परिसरात आज दुपारी माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना घडली. एका

Minister Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून..... निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ३ कोटी ३८ लाखांच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाला मंजुरी

निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळणार सुसज्ज विस्तारीत इमारत.... येवला : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व

Iran-US-Israel War : बेरूतमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहच्या प्रमुख नेत्याच्या मृत्यूचा इस्त्रायलने केला दावा

फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या अमेरिका - इस्त्रायल आणि इराण (Iran-US-Israel War) या युद्धात अमेरिका आणि इस्रायलने

Gangster Atiq Ahmed : प्रयागराज हादरलं! गँगस्टर अतीक अहमदच्या ड्रायव्हरची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आज म्हणजेच गुरुवार ९ एप्रिल रोजी अतीक अहमदचा (Gangster Atiq Ahmed) ड्रायव्हर, मोहम्मद इरफान,