अतुल सुभाष आत्महत्या: पत्नी निकिता सिंघानियासह सर्व चार आरोपींना जामीन

  83

मुंबई: अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात(atul subhash suicide case) बंगळुरूच्या सिटी सिव्हिल कोर्टाने शनिवारी निकिता सिंघानिया, तिची आई निशा सिंघानया आणि भाऊ अनुराग सिंघानियासह सर्व आरोपींना जामीन दिला आहे. याआधी न्यायालयाने दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतले.


सुनावणीदरम्यान निकिता सिंघानियाच्या वकिलांनी पोलिसांकडून केलेल्या उचित आधारांच्या अनुपस्थितीचा हवाला देत असा तर्क दिला की त्यांची अटक ही अवैध होती.


बंगळुरू कोर्टाच्या आदेशानंतर निकिता, निशा आणि अनुराग सिंघानिया यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. यानंतर त्यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून कोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. बंगळुरू पोलिसांनी यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम १०८ आणि ३(५) अंतर्गत केस दाखल केली आहे. यात भारतीय दंड विधानाच्या ३(५) अनुसार जेव्हा अनेक व्यक्ती मिळून एकाच इराद्याने गुन्हा करतात तेव्हा त्याची जबाबदारी सर्वांची असते.


तर कलम १०८ हे आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी लावण्यात आले. यात एखादी व्यक्ती जर आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासाठी दोषी आढळल्यास त्या व्यक्तीला १० वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.



अतुल सुभाषने काय केले होते आरोप?


अतुलने आत्महत्येआधी १ तास २३ मिनिटांचा व्हिडिओ आणि २४ पानांचे सुसाईड नोट जारी करत आपली पत्नी आणि तिच्या कुटुंबियांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. त्यांनी सिंघानिया यांच्यावर प्रकरण संपवण्यासाठी ३ कोटी रूपयांची मागणी केल्याचा आरोप लावला होता.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके