अतुल सुभाष आत्महत्या: पत्नी निकिता सिंघानियासह सर्व चार आरोपींना जामीन

मुंबई: अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात(atul subhash suicide case) बंगळुरूच्या सिटी सिव्हिल कोर्टाने शनिवारी निकिता सिंघानिया, तिची आई निशा सिंघानया आणि भाऊ अनुराग सिंघानियासह सर्व आरोपींना जामीन दिला आहे. याआधी न्यायालयाने दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतले.


सुनावणीदरम्यान निकिता सिंघानियाच्या वकिलांनी पोलिसांकडून केलेल्या उचित आधारांच्या अनुपस्थितीचा हवाला देत असा तर्क दिला की त्यांची अटक ही अवैध होती.


बंगळुरू कोर्टाच्या आदेशानंतर निकिता, निशा आणि अनुराग सिंघानिया यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. यानंतर त्यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून कोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. बंगळुरू पोलिसांनी यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम १०८ आणि ३(५) अंतर्गत केस दाखल केली आहे. यात भारतीय दंड विधानाच्या ३(५) अनुसार जेव्हा अनेक व्यक्ती मिळून एकाच इराद्याने गुन्हा करतात तेव्हा त्याची जबाबदारी सर्वांची असते.


तर कलम १०८ हे आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी लावण्यात आले. यात एखादी व्यक्ती जर आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासाठी दोषी आढळल्यास त्या व्यक्तीला १० वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.



अतुल सुभाषने काय केले होते आरोप?


अतुलने आत्महत्येआधी १ तास २३ मिनिटांचा व्हिडिओ आणि २४ पानांचे सुसाईड नोट जारी करत आपली पत्नी आणि तिच्या कुटुंबियांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. त्यांनी सिंघानिया यांच्यावर प्रकरण संपवण्यासाठी ३ कोटी रूपयांची मागणी केल्याचा आरोप लावला होता.

Comments
Add Comment

नोव्हेंबरपासून देशात सुरू होणार नवे नियम, जाणून घ्या सविस्तर!

नवी दिल्ली: ऑक्टोबर महिना काहीच दिवसात संपणार असून येणाऱ्या नवीन महिन्यापासून देशभरात आधारकार्डपासून

१ नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने १ नोव्हेंबरपासून वस्तू आणि सेवा कर नोंदणी आणखी सोपी करण्यासाठी नवी प्रणाली सुरू

जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’

नवी दिल्ली : विज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाधारित नवोन्मेषाच्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट आणि

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी