Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला! २ जवानांचा मृत्यू, ५ जण गंभीर जखमी

बांदीपोरा : काही दिवसांपूर्वी पूंछ जिल्ह्यातील एलओसीजवळ सैन्य दलाचं वाहन ३०० फूट दरीत कोसळून भीषण अपघात घडला होता. हे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळल्याची (Jammu Kashmir Truck Accident) घटना घडली आहे. यामध्ये २ जवानांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा बांदीपोरा येथून सदर कूट पायीन भागातून जाताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच सुरक्षा दल आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Jammu Kashmir Truck Accident)

Comments
Add Comment

पश्चिम आशियात तणाव वाढला; पंतप्रधान मोदींनी केली आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

- ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर

गोव्याचे मुख्यमंत्री लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, नेमकं झालं काय?

पुणे: गुढी पाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते.

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने

गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण,

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू