PM Modi : अण्णा हजारेंना पुढे करून काही लोकांनी दिल्लीतील लोकांना संकटात ढकलले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फुंकले आपविरोधात प्रचाराचे रणशिंग

नवी दिल्ली : आम आदमी पार्टी अर्थात आप ही आपत्ती आहे. ती सहन करणार नाही आणि दिल्लीतील परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार दिल्लीतील मतदारांनी केला असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपविरोधात प्रचाराचे रणशिंग फुंकले. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बेईमान लोक म्हणत मोदींनी वार केला. अण्णा हजारेंना पुढे करून काही लोकांनी दिल्लीतील लोकांना संकटात ढकलले, असे ते म्हणाले.


दिल्लीतील अशोक विहार येथे झोपडपट्टी धारकांना घरांचे वाटप करण्यात आले. १६७५ झोपडपट्टीधारकांना फ्लॅटच्या चाव्या देण्यात आल्या. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल आणि आप सरकारवर जोरदार हल्ला चढवला.


पंतप्रधान मोदी म्हणाले, मद्य परवाना प्रकरणात घोटाळा, मुलांच्या शाळेत घोटाळा, गरिबांच्या उपचारात भ्रष्टाचार, प्रदूषणाविरोधात लढण्याच्या नावाखाली भ्रष्टाचार, नोकर भरतीत भ्रष्टाचार. हे लोक दिल्लीच्या विकासाच्या गोष्टी करत होते. पण, हे लोक, आप आपत्तीच्या रुपात दिल्लीवर तुटून पडली आहे.



पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोट ठेवत आप सरकारला लक्ष्य केले. हे लोक इथे भ्रष्टाचार करतात. आणि त्याचे समर्थनही करतात. चोर तर चोर वर शिरजोर! आप ही आपत्ती दिल्लीवर आलेली आहे. त्यामुळे दिल्लीकरांनी आपत्तीविरोधात लढाईचे रणशिंग फुंकलं आहे. दिल्लीतील मतदारांनी दिल्लीला आपत्तीतून (आप) मुक्त करण्याचा निर्धार केला आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.


दिल्लीतील प्रत्येक नागरिक म्हणतोय, दिल्लीतील प्रत्येक मुलं म्हणतेय, दिल्लीतील प्रत्येक गल्लीतून आवाज येतोय की आपत्ती सहन करणार नाही, बदलल्याशिवाय राहणार नाही. आपत्ती सहन करणार नाही, बदलल्याशिवाय राहणार नाही, असे मोदी दिल्लीतील कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

मोदी विरुद्ध केजरीवाल असा थेट सामना होण्याची शक्यता


दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. तर पुढील महिन्यात मतदान होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी, दिल्लीत विविध विकासाकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी करुन निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. तर काँग्रेस पक्ष राजधानीत म्हणावा तेवढा मजबूत नाही. त्याबरोबरच काँग्रेसकडे दिल्लीतील स्थानिक प्रभावी चेहरा नाही. त्यामुळे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल असा थेट सामना होण्याची शक्यता आहे.


'आप' नव्हे 'आपदा' (आपत्ती), प्रचाराची लाईन ठरली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पहिल्याच कार्यक्रमात आपविरोधात प्रचाराची लाईन निश्चित केल्याची चर्चा सुरू झाली आहे. 'आप' नव्हे 'आपदा' (आपत्ती) असे मोदींनी म्हटले. त्याचबरोबर दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपविरोधात भ्रष्टाचाराचा मुद्दा हा भाजपच्या प्रामुख्याने अजेंड्यावर असेल, असे संकेतही या सभेतून दिले. शुक्रवारी दिल्ली भाजपने ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘दिल्ली चली मोदी के साथ’. तसेच या अगोदरही पक्षाने ही निवडणूक पंतप्रधान मोदी यांच्या चेहऱ्यावर लढण्याचे संकेत दिले होते. आता हे संकेत खरे ठरत असून भाजप ही निवडणूक पंतप्रधान मोदी यांच्या चेहऱ्यावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या