MHADA : म्हाडाची १० घुसखोरांना घरे खाली करण्याची नोटीस

मुंबई : लॉटरीत न विक्री झालेल्या म्हाडाच्या मानखुर्द येथील ३४ घरांमध्ये घुसखोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाने कारवाई करीत १० जणांना तत्काळ सदनिका खाली करण्याचे निर्देश दिले आहेत. सदनिका खाली न केल्यास कडक कारवाई केली जाईल, असे बजावले आहे.




MHADA

उर्वरित २४ घुसखोरांनी म्हाडाच्या कारवाईविरोधात अपिलीय अधिकाऱ्याकडे दाद मागितली आहे. त्यामुळे पुढे काय निर्णय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. म्हाडाने २०१८मध्ये घरांच्या विक्रीसाठी काढलेल्या लाॅटरीत मानखुर्द येथील घरांचा समावेश केला होता; मात्र ३४ घरांची विक्री न झाल्याने ती पडून होती. कोरोना काळात या घरांमध्ये घुसखोरी झाली. त्यांच्याविरोधात कारवाई सुरू करीत म्हाडाच्या सक्षम प्राधिकृत अधिकारी-२ यांनी संबंधितांना घरे खाली करण्याचे निर्देश देतानाच गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली होती; मात्र ३४ पैकी २४ घुसखोरांनी सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात अपिलीय अधिकाऱ्याकडे दाद मागितली आहे. त्यानुसार आता सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यासमोर त्यावर सुनावणी होणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, इतर १० घुसखोरांवर कारवाई अटळ असल्याचे दिसत आहे.

Comments
Add Comment

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी

राज्यात जनसुरक्षा कायदा लागू

अध्यादेश जारी; कडव्या डाव्या संघटनांवर होणार कारवाई मुंबई : बहुचर्चित जनसुरक्षा कायदा अखेर राज्यात लागू झाला