सावधान....! उघड्यावर शौचास बसल्यास होणार दंड

  64

अमरावती: जिल्ह्यातील गावांमध्ये उघड्यावर शौचास जात असलेल्या ग्रामस्थांवर स्थानिक दक्षता समिती मार्फत कारवाईचे आदेश दिले आहे. याची अंमलबजावणी ७ जानेवारी पासून होणार आहे. उघडयावर शौचास बसल्यास कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तत्पूर्वी पहीले दोन आठवडे पुष्प देवुन त्यांना सतंक केले जाईल. त्यानंत दंडाची कारवाई केली जाणार आहे.


अमरावती जिल्ह्यातील काही गावांमध्ये अद्यापही ग्रामस्थ उघड्यावर शौचास बसून गावाच्या सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करित आहे. अशा तक्रारी प्राप्त झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी, संजिता महापात्रया अॅक्शन मोडवर आल्या असून त्यांनी गुरूवारी तातडीने १४ पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकारी यांना पत्राव्दारे कारवाईच्या सुचना दिल्या आहेत.


ग्रामस्तरावर रहागणदारीमुक्त गावं निगराणी समिती तथा दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीचे अध्यक्ष हे ग्राम पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष असून यामध्ये ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत अधिकारी,शिक्षक,पोलीस पाटील,अंगणवाडी सेविक, आशा, स्वच्छग्रही यांचा समावेश करण्यात आलेला आहे.


यामधील स्वच्छाग्रही यांना गुडमार्निग किट सुध्दा वितरीत करण्यात आली आहे. त्यामध्येटॉर्च, व्हीसल, कॅप, टी-शर्ट, सॅक ई. साहित्य देण्यात आले आहे. ग्रामस्तरावर गठीत करण्यात आलेल्या रहागणदारीमुक्त गावं निगराणी समिती तथा दक्षता समितीर ने ७ जानेवारी पासून आठवडयातून कोणतेही तीन दिवस नियमीत पणे गुडमॉर्निग किवा गुडईव्हनिग उपक्रम राबवून उघड्यावर शौचास बसणाऱ्या ग्रामस्थाना प्रथम दोन आठवडे गावस्तरावर उपलब्ध होणारे पुष्प देवून उघडयावर शौचास बसण्याच्या कृतीचा प्रतिकात्मक विरोध केल्या जाणार आहे.


त्यानतंर तिसऱ्या आढवड्यापासून, उघडयावर शौचास बसणाऱ्या ग्रामस्थांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलमानुसार तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११५ ते ११७ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सदरच्या उपक्रमाचे सनियंत्रणासाठी तालुकास्तरावरुन विस्तार अधिकारी किवा समकक्ष अधिकारी यांची १० ग्रामपंचायती करिता नेमणूक करण्यात येणार आहे. ७ जानेवारी पासून पुढील २ महिण्याचे दैनिक नियोजन ५ जानेवारी पुर्वी पाठविण्यात यावे. असे निर्देश गट विकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. प्राप्त नियोजना नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, संजिता महापात्र ह्या सुध्दा गुडमॉर्निग उपक्रमास आकस्मीक भेटी देणार असल्याने गटविकास अधिकारी ही चांगलेच धास्तावले आहेत.

Comments
Add Comment

वारीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अबू आझमी यांनी मागितली माफी

मुंबई: वारी संदर्भात केलेल्या वादग्रस्त (Abu Azmi Wari Controversy) वक्तव्यानंतर, अबू आझमी यांना आपली चूक लक्षात आली आहे.  "माझ्या

संगमनेर खुर्द येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

१० जण ताब्यात, तर ५ लाखांचा मुद्देमाल जप्त संगमनेर : संगमनेर शहरालगत असलेल्या संगमनेर खुर्द येथे प्रवरा नदीच्या

रस्त्यावर बेशिस्तपणे, नो-पार्किंग झोनमध्ये लावलेली वाहने जप्त होणार : यशवंत डांगे

अहिल्यानगर : महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात पे अँड पार्क सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी खासगी संस्थेची

जामखेडमध्ये काळ्या काचा कुणाच्या आश्रयाने ?

पीएसआयच्या धडाकेबाज कारवाईने राजकीय मंडळींच्या भुवया उंचवल्या जामखेड : जामखेड शहरात गेल्या काही

वारकऱ्यांसाठी रेनकोट वाटणाऱ्या उद्योजकाला मृत्यूने वळसा घालून दिले जीवनदान !

श्रीगोंदा : मानवतेचे ऋण फेडण्याच्या भावनेतून सदैव समाजासाठी कार्य करणाऱ्या राजापूर (मंगलवाडी) येथील युवा

डॉक्टरकडून सहकारी महिला डॉक्टरला गंडा

विवाहाचे आमिष; साडेसात लाखांची फसवणूक नाशिक : समाजमाध्यमाद्वारे महिलेशी ओळख करून तिला लग्न करण्याचे आमिष