सावधान....! उघड्यावर शौचास बसल्यास होणार दंड

अमरावती: जिल्ह्यातील गावांमध्ये उघड्यावर शौचास जात असलेल्या ग्रामस्थांवर स्थानिक दक्षता समिती मार्फत कारवाईचे आदेश दिले आहे. याची अंमलबजावणी ७ जानेवारी पासून होणार आहे. उघडयावर शौचास बसल्यास कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तत्पूर्वी पहीले दोन आठवडे पुष्प देवुन त्यांना सतंक केले जाईल. त्यानंत दंडाची कारवाई केली जाणार आहे.


अमरावती जिल्ह्यातील काही गावांमध्ये अद्यापही ग्रामस्थ उघड्यावर शौचास बसून गावाच्या सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करित आहे. अशा तक्रारी प्राप्त झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी, संजिता महापात्रया अॅक्शन मोडवर आल्या असून त्यांनी गुरूवारी तातडीने १४ पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकारी यांना पत्राव्दारे कारवाईच्या सुचना दिल्या आहेत.


ग्रामस्तरावर रहागणदारीमुक्त गावं निगराणी समिती तथा दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीचे अध्यक्ष हे ग्राम पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष असून यामध्ये ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत अधिकारी,शिक्षक,पोलीस पाटील,अंगणवाडी सेविक, आशा, स्वच्छग्रही यांचा समावेश करण्यात आलेला आहे.


यामधील स्वच्छाग्रही यांना गुडमार्निग किट सुध्दा वितरीत करण्यात आली आहे. त्यामध्येटॉर्च, व्हीसल, कॅप, टी-शर्ट, सॅक ई. साहित्य देण्यात आले आहे. ग्रामस्तरावर गठीत करण्यात आलेल्या रहागणदारीमुक्त गावं निगराणी समिती तथा दक्षता समितीर ने ७ जानेवारी पासून आठवडयातून कोणतेही तीन दिवस नियमीत पणे गुडमॉर्निग किवा गुडईव्हनिग उपक्रम राबवून उघड्यावर शौचास बसणाऱ्या ग्रामस्थाना प्रथम दोन आठवडे गावस्तरावर उपलब्ध होणारे पुष्प देवून उघडयावर शौचास बसण्याच्या कृतीचा प्रतिकात्मक विरोध केल्या जाणार आहे.


त्यानतंर तिसऱ्या आढवड्यापासून, उघडयावर शौचास बसणाऱ्या ग्रामस्थांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलमानुसार तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११५ ते ११७ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सदरच्या उपक्रमाचे सनियंत्रणासाठी तालुकास्तरावरुन विस्तार अधिकारी किवा समकक्ष अधिकारी यांची १० ग्रामपंचायती करिता नेमणूक करण्यात येणार आहे. ७ जानेवारी पासून पुढील २ महिण्याचे दैनिक नियोजन ५ जानेवारी पुर्वी पाठविण्यात यावे. असे निर्देश गट विकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. प्राप्त नियोजना नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, संजिता महापात्र ह्या सुध्दा गुडमॉर्निग उपक्रमास आकस्मीक भेटी देणार असल्याने गटविकास अधिकारी ही चांगलेच धास्तावले आहेत.

Comments
Add Comment

विहिरीतील मोटार काढताना काळाचा घाला; धाराशिवमध्ये बाप-लेकासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र

‘या’ उमेदवारांना मत देणार नाही; नाशिकमधील गावकऱ्यांचा ठाम निर्णय

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची

Tragedy at Nagpur Bachelor Party : मैत्री की क्रूरता? पार्टीत अडथळा नको म्हणून बेशुद्ध मित्राला चादरीत गुंडाळून फेकून दिलं; बॅचलर पार्टीचा 'सैतानी' चेहरा समोर

नागपूर : नागपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मित्राच्या

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन

आधी मतांसाठी सोनं वाटलं, पराभवानंतर धमकी देत.... अन त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

नाशिक : निवडणुकीपूर्वी ‘कुबेर’ बनून मतदारांवर सोन्याची बरसात करणारा उमेदवार, पराभवानंतर मात्र मतदारांच्या

कोरेगाव भीमा विजयी दिनानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; कोणते पर्यायी मार्ग वापरावेत?

पुणे: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो अनुयायी पुण्यात येत असतात.