

Vinod Kambli Home : विनोद कांबळी राहत घर गमावणारं!
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी हा चर्चेचा विषय ठरला आहे. मध्यंतरी विनोद कांबळीची प्रकृती खालावली असल्याने त्याला ठाणे येथील ...
रोहित शर्माने बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या चार पैकी तीन कसोटी सामन्यांतील पाच डावात फलंदाजी केली आणि फक्त ३१ धावा केल्या. या निराशाजनक कामगिरीमुळे संघ व्यवस्थापनाने कर्णधार रोहितला सिडनी कसोटीतून वगळण्याचा कठोर निर्णय घेतला. सिडनी कसोटीसाठी संघ व्यवस्थापनाने जसप्रीत बुमराहची कर्णधार म्हणून निवड केली. कर्णधार बदलला तरी भारताच्या कामगिरी अद्याप सुधारणा झालेली नाही. भारताचा पहिला डाव १८५ धावांत आटोपला. भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने सर्वाधिक ४० धावा केल्या. यशस्वी जयस्वाल १०, केएल राहुल ४, शुभमन गिल २०, विराट कोहली १७, रविंद्र जडेजा २६, वॉशिंग्टन सुंदर १४, प्रसिद्ध क्रिष्णा ३, जसप्रीत बुमराह २२ करून बाद झाले. नितीश रेड्डी शून्य धावा करून परतला. मोहम्मद सिराज ३ धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने सर्वाधिक चार तर मिचेल स्टार्कने तीन, कर्णधार पॅट कमिन्सने दोन बळी घेतले. नॅथन लियॉनने एक बळी घेतला.

गोलंदाज जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक कामगिरी
सिडनी : भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ही कामगिरी करून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजांच्या यादीत ...
बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पहिला कसोटी सामना भारताने तर दुसरा आणि चौथा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. अॅडलेड येथे झालेली तिसरी कसोटी अनिर्णित राहिली होती. यामुळे मालिकेत ऑस्ट्रेलियाकडे २ - १ अशी आघाडी आहे. आता सिडनीत पाचवी आणि निर्णायक कसोटी सुरू आहे. ही कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचे आव्हान भारतापुढे आहे.