शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक भाजपाच्या वाटेवर

पुणे : कोकणातील राजापूरचे माजी आमदार राजन साळवी भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात आता पुण्यातही शिवसेना उबाठाला (Shivsena UBT) मोठे भगदाड पडणार आहे. नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच पुण्यात राजकीय भूकंपाची चिन्हे आहेत. उबाठा गटाचे पाच माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असून या नगरसेवकांनी नुकतीच पुण्यातील एका मोठ्या राजकीय नेत्यासोबत भाजपाच्या राज्यातील नेत्यांची मुंबईत जावून भेट घेतली आहे. त्यानंतर लवकरच हे नगरसेवक मुंबई अथवा पुण्यात भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.


लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पाठोपाठ राज्यात पुढील काही महिन्यात राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. त्यातच, राज्यात लोकसभा निवडणूकीत पिछेहाट झालेल्या भाजपाला विधानसभा निवडणूकीत मतदारांनी पसंती दिली असून पुण्यातही भाजपाला शत प्रतिशत यश मिळाले असून भाजपाच्या सर्व जागा निवडून आलेल्या आहेत.



त्यामुळे, २०१७ मध्ये महापालिकेवर निर्विवाद यश मिळालेल्या भाजपाची सत्ता महापालिकेतही कायम राहण्याची शक्यता असल्याने उबाठा गटाच्या नगरसेवकांनी धसका घेतला असून भाजपामध्ये जाण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी, या पाच नगरसेवकांनी नुकतीच मुंबई वारी केली असून त्यांना पक्षात पद देण्यासह, महापालिका निवडणूकीचे तिकिटही देण्याची तयारी भाजपाकडून दर्शविण्यात आली आहे.


त्यामुळे, महापालिका निवडणूकीत भाजपा विरोधात लढण्यापेक्षा त्यांच्या सोबत जाण्याची भूमिका या माजी नगरसेवकांनी घेत भाजपाची वाट धरली असून पुढील काही दिवसात ते भाजपामध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात काही विधानसभेसाठी इच्छूक असलेल्या माजी नगरसेवकांचाही समावेश असून दोन महिला तर तीन पुरूष माजी नगरसेवकांचा समावेश आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनवडे, प्राची आल्हाट, संगीता ठोसर, पल्लवी जावळे हे पाच जण भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद