शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक भाजपाच्या वाटेवर

  86

पुणे : कोकणातील राजापूरचे माजी आमदार राजन साळवी भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात आता पुण्यातही शिवसेना उबाठाला (Shivsena UBT) मोठे भगदाड पडणार आहे. नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच पुण्यात राजकीय भूकंपाची चिन्हे आहेत. उबाठा गटाचे पाच माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असून या नगरसेवकांनी नुकतीच पुण्यातील एका मोठ्या राजकीय नेत्यासोबत भाजपाच्या राज्यातील नेत्यांची मुंबईत जावून भेट घेतली आहे. त्यानंतर लवकरच हे नगरसेवक मुंबई अथवा पुण्यात भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.


लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पाठोपाठ राज्यात पुढील काही महिन्यात राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. त्यातच, राज्यात लोकसभा निवडणूकीत पिछेहाट झालेल्या भाजपाला विधानसभा निवडणूकीत मतदारांनी पसंती दिली असून पुण्यातही भाजपाला शत प्रतिशत यश मिळाले असून भाजपाच्या सर्व जागा निवडून आलेल्या आहेत.



त्यामुळे, २०१७ मध्ये महापालिकेवर निर्विवाद यश मिळालेल्या भाजपाची सत्ता महापालिकेतही कायम राहण्याची शक्यता असल्याने उबाठा गटाच्या नगरसेवकांनी धसका घेतला असून भाजपामध्ये जाण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी, या पाच नगरसेवकांनी नुकतीच मुंबई वारी केली असून त्यांना पक्षात पद देण्यासह, महापालिका निवडणूकीचे तिकिटही देण्याची तयारी भाजपाकडून दर्शविण्यात आली आहे.


त्यामुळे, महापालिका निवडणूकीत भाजपा विरोधात लढण्यापेक्षा त्यांच्या सोबत जाण्याची भूमिका या माजी नगरसेवकांनी घेत भाजपाची वाट धरली असून पुढील काही दिवसात ते भाजपामध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात काही विधानसभेसाठी इच्छूक असलेल्या माजी नगरसेवकांचाही समावेश असून दोन महिला तर तीन पुरूष माजी नगरसेवकांचा समावेश आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनवडे, प्राची आल्हाट, संगीता ठोसर, पल्लवी जावळे हे पाच जण भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित