उद्धव गटाला सतावतेय पक्ष फुटीची भीती

मुंबई : उद्धव गटाला पक्ष फुटण्याची भीती सतावत आहे. नव्या वर्षाची सुरुवात होत नाहीत तोच कोकणातील राजापूरचे माजी आमदार राजन साळवी भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकटे राजन साळवीच नाही तर आणखी काही जण शिवसेना किंवा भाजपात प्रवेश करणार आणि उद्धव गटाला कायमचा 'जय महाराष्ट्र' करणार अशीही चर्चा आहे.



निवडणूक आयोगाने घोषणा केली नसली तरी एप्रिल - मे २०२५ मध्ये मुंबई - ठाण्यासह अनेक महापालिकांच्या निवडणुकांची शक्यता आहे. या निवडणुकांची घोषणा झाल्यास उद्धव गटातील अनेकजण सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.



राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे विधानसभेत ५७ आमदार निवडून आले तर उद्धव गटाचे २० आमदार निवडून आले. उद्धव गटाचे बहुसंख्य आमदार हे मुंबईतले आहेत. यामुळे राज्याच्या उर्वरित भागातील शिवसैनिकांना एकनाथ शिंदे यांचेच नेतृत्व मान्य असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षाची सुरुवात होताच उद्धव गट फुटणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. उद्धव गटात असलेले राजापूरचे माजी आमदार राजन साळवी भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. उद्धव गटाचे वेगवेगळ्या शहरांतील माजी नगरसेवक भाजपा आणि शिवसेना नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि लवकरच पक्षांतर करणार असल्याचे वृत्त आहे.
Comments
Add Comment

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,

मुबंईत येत्या मंगळवारपासून तीन दिवस १० टक्के पाणीकपात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्हॅट

भायखळा-सायन स्थानकांदरम्यान पायाभूत कामांसाठी ब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : सायन (शीव) आणि भायखळा अशा दोन रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलाच्या कामांसाठी मध्य रेल्वेकडून

पथदर्शी धोरणानुसार मुंबई महापालिकेच्या शाळा १० मजली होणार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने आपल्या शाळांच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.