Delhi Savarkar Collage : दिल्लीत स्वातंत्र्यवीरांच्या नावाने सुरू होणार महाविद्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संकुलाची पायाभरणी


नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने महाविद्यालय सुरू होणार आहे. ३ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली विद्यापीठा अंतर्गत २ संकुलाची पायाभरणी करणार आहेत. यापैकी एका महाविद्यालयाचे नाव स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने असेल.


दिल्ली विद्यापीठात पूर्व आणि पश्चिम असे २ नवे कॅम्पस उभारले जाणार आहेत. यासंदर्भात २०२१ मध्ये दिल्ली विद्यापीठाने निर्णय घेतला होता. त्यानुसार द्वारका आणि नजफगढ भागात ३ महाविद्यालयाची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होणार आहे. या सर्व प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान मोदी करणार आहेत. त्यात रोशनपुरा, नजफगढ येथे स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयचाही समावेश आहे, ज्यामध्ये शिक्षणासाठी अत्याधुनिक सुविधा असतील. यासाठी १४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर सुरजमल विहार परिसरात तयार होत असलेल्या शैक्षणिक संकुलासाठी ३७३ कोटी रुपये तर द्वारका भागातील शैक्षणिक संकुलासाठी १०७ कोटी खर्च अपेक्षित आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सीबीएसईच्या एकात्मिक कार्यालय संकुलाचे उद्घाटन केले जाणार आहे. तसेच अशोक विहार येथील स्वाभिमान अपार्टमेंट्स येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नव्याने बांधलेल्या १६७५ सदनिकांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याबरोबर नौरोजी नगर येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि सरोजिनी नगर येथील जीपीआरए टाईप-२ क्वार्टर्स या दोन नागरी पुनर्विकास प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत.

Comments
Add Comment

Digital India : आधार ॲपने 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली : आधार ॲपला लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून हे ॲप सुरु झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी

Lucknow Fire : लखनौत तीन मजली इमारतीला आग, १४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात आज, सोमवारी दुपारी एक तीन मजली इमारतीला भीषण आग

Massive Fire : लखनौमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी इमारतीतून थरारक उड्या

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीने मोठी खळबळ उडवून

West Bengal's Bold Budget : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २० टक्क्यांनी वाढला; विद्यार्थीनी आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा आणि विविध घटकांना दिलासा देणारा राज्याचा अर्थसंकल्प

Monsoon havoc in Jharkhand : वीज पडून ८ जणांचा मृत्यू, क्रिकेट सामन्यादरम्यान एकाचा दुर्दैवी अंत

रांची (झारखंड) : झारखंडमध्ये नैऋत्य मान्सूनच्या आगमनासोबतच निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. गेल्या २४

८.६ लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन तीन टँकर भारताकडे रवाना ऊर्जा पुरवठा सुरक्षेला मोठा दिलासा

नवी दिल्ली : भारताच्या सागरी आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय ध्वज असलेले तीन