Crime : मुलीशी बोलतो या रागातून १७ वर्षीय मुलाची केली दगडाने ठेचून हत्या; मुलीचे वडील व २ भाऊ अटकेत

  77

पुणे : आपल्या मुलीशी एक १७ वर्षीय मुलगा मैत्री करुन बोलत असल्याचा राग येऊन सदर मुलास मुलीच्या पालकांनी तिच्याशी बोलू नको अशी समज दिली होती. परंतु त्यानंतर देखील तो मुलीशी बोलत असल्याच्या रागातून मुलीचे वडील व भावांनी संबंधित मुलास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन तसेच लोखंडी रॉड डोक्यात मारुन त्याला गंभीर जखमी करत डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार वाघोली परिसरात घडला आहे. गणेश वाघू धांडे (वय-१७) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.


याप्रकरणी आरोपी लक्ष्मण पेटकर (६०), सुधीर पेटकर (३२) व नितीन पेटकर (३१, तिघे रा. वाघेश्वरनगर, गोरे वस्ती, वाघोली, पुणे) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.


याबाबत मयत मुलाचे वडील वाघु मारुती धांडे (वय- ६४, रा. वाघोली, पुणे) यांनी आरोपी विरोधात वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश धांडे हा दोन जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता त्याच्या मित्रांसोबत घराजवळ दुचाकीवरुन येत होता. त्यावेळी आरोपींनी मुलीशी बोलत असल्याचा राग मनात धरुन त्यास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन लोखंडी रॉड व दगड त्याच्या डोक्यात मारुन त्याचा खून केला. त्यानंतर आरोपी पसार झाले.


पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर, घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा पंचनामा करत शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. तसेच आरोपींना देखील अटक केली. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे करत आहेत.


वाघोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड म्हणाले, मयत मुलाचे वडील हे मजुरी काम करत होते व त्यांना मुलगा देखील सहाय्य करत होता. ते राहत असलेल्या ठिकाणाजवळच आरोपी यांचे कुटुंब राहत आहे. कुठल्यातरी अज्ञात कारणास्तव मनात राग धरुन आरोपींनी गणेश यास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करत संगनमताने त्यास जीवे ठार मारले आहे.

Comments
Add Comment

Manoj Jarange Patil : मुंबई दौऱ्याआधीच जरांगेंची तब्येत बिघडली! नेमकं काय घडलं?

डॉक्टरांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला नांदेड: मराठा आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष संघर्ष करत असलेले मनोज

स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दिग्गजांचा अजित पवारांनी केला सत्कार

बीड : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी व

आंबा घाटात दरड कोसळली ! वाहतूक ठप्प

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर आंबा घाटात दरड कोसळण्याची गंभीर घटना घडली आहे. साखरपा मुर्शी चेक

मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करताय तर वाहतुकीचे हे बदल पाहा

गणपती म्हटलं की कोकणकर गावाला जाणार नाही असं होत नाही. मात्र दरवर्षीप्रमाणे त्रासदायक असणारा मार्ग म्हणजे

स्वातंत्र्यदिनी राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण

पुणे : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुणे येथे मुख्य

कोकणात मुसळधार पावसाने झोडपले, पाऊस आणि वाऱ्यामुळे मासेमारी ठप्प

मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मुसळधार