Terrorist Attack In Manipur : मणिपूरमध्ये वर्षाच्या पहिल्याच दिवशी अतिरेकी हल्ला

इम्फाल : मणिपूरमध्ये वर्षभरात झालेल्‍या हिंसाचाराबद्दल मुख्‍यमंत्री बिरेन सिंह यांनी माफी मागितल्यानंतर अवघ्या काही
तासात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला. राज्याच्या इम्फाल पश्चिम जिल्ह्यातील कडंगबंद परिसरात अतिरेक्यांनी गोळीबारानंतर बॉम्‍बफेक केल्याची घटना घडली. यासंदर्भातील माहितीनुसार आज, बुधवारी पहाटे मणिपूरच्या इम्फाल पश्चिम जिल्ह्यातील कडंगबंद भागात संशयित दहशतवाद्यांनी हल्ला केला. अत्याधुनिक शस्त्रांनी गोळीबार केला. पश्चिम जिल्ह्यातील सखल कादंगबंद भागात बॉम्बफेकही केली.


अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याला ग्राम स्वयंसेवकांनी प्रत्युत्तर दिले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल या भागात पाठवण्यात आले आहे. दरम्‍यान, मणिपूरमध्ये ३ मे २०२३ मध्ये हिंसाचार सुरू झाल्यापासून संशयित अतिरेक्यांनी कडंगबंद भागात अनेक हल्ले केले आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांनी ३१ डिसेंबर रोजी वर्षभरातील हिंसाचारासाठी राज्याच्या जनतेची क्षमायाचना करून नवीन वर्षात शांततेने एकत्र नांदण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर लगेच झालेल्या या हल्ल्यामुळे पुन्हा हिंसाचार उफाळण्याची भीती निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू