नगदी पीक असूनही जवसकडे शेतकऱ्यांची पाठ

वाडा : जवस पीक हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून ओळखले जाते. जवसचा उपयोग तेल काढणे आणि धागा निर्मितीसाठी देखील केला जातो. जवस हे पौष्टिक असून, यातून आठ प्रकारची प्रथिने, कार्बोदके, जीवनसत्वे व खनिजे मिळतात. जवस तेलात 58% ओमेगा तीन, ओमेगा सहा, कोलेस्टेरॉल आणि अँटीऑक्सिडंट असतात.



जवसला बाजारात चांगली मागणी असते. भावही चांगला आहे परंतु वाडा तालुक्यात जवस पीक घेतलं जात नाही एका दुसरा शेतकरी हे पीक घेतो. कृषी विभागाकडून तेलबिया पीक लागवडीकडे शेतकऱ्यांना वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे पीक घेताना अडचणी येत असल्याने या पिकाकडे पाठ ठेवण्याचे चित्र दिसत आहे.



जवस ला भाव काय ?

विविध ठिकाणी कमी अधिक प्रमाणात दर आढळून येतात. जवस पिकाला दहा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो.

वाड्यात पेरा अत्यल्प

तालुक्यात जवस यातील बियांचे पीक एखात दुसरे शेतकरी घेतात. त्यामुळे या पिकाची पेरणी एकदम अत्यल्प आहे.

भाजीपाला, हरभरा, वालाकडे कल

जवस उत्पादक शेतकऱ्यांना मळणी यंत्र उपलब्ध होत नाही. एक पद्धतीने खळे करून मळणीचे काम होत होते. मात्र, यामध्ये बैलजोडी आणि मजुरांची गरज भासते. बैलजोडी व मजूर मिळत नाही अशा अडचणीचा सामना करावा लागतो. - काळुराम पाटील, शेतकरी

उत्पादन अपेक्षित होत नाही जवसाकडे पीक म्हणून बघितले जात नाही. शेतकऱ्यांचा नगदी पीक घेण्याकडे कल असतो. रब्बी हंगामात भाजीपाला, हरभरा, वाल अशी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. - प्रदीप गोरे, शेतकरी
Comments
Add Comment

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या