Gadchiroli ST Bus : स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतर गट्टा ते वांगेतुरीतील गावकरी करणार एसटी प्रवास!

मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली बसला दाखवला हिरवा झेंडा


गडचिरोली : राज्यभरात अनेक भागात एसटी बसची (ST Bus) सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र अजूनही काही ग्रामीण भागात बसची सोय नसल्याचे दिसून येते. त्यामुळे गावकऱ्यांना पायी प्रवास करावा लागत आहे. गडचिरोलीतील (Gadchiroli) गर्देवाडा ते वांगेतुरी मार्गावर पक्के रस्ते आणि पुलमार्ग नसल्यामुळे तेथील गावकरी लालपरीच्या प्रवासाला मुकलर होते. मात्र आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी या गावकऱ्यांना नववर्षाचं मोठ्ठ गिफ्ट मिळालं आहे.



स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतर गट्टा ते वांगेतुरी गावात एसटी बस धावली आहे. यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात काही महिन्यांपूर्वीपर्यंत केवळ गर्देवाडापर्यंत बस प्रवास उपलब्ध होता. तर छत्तीसगड सीमेच्या दिशेने अनेक किलोमीटरपर्यंत पक्क्या रस्त्याचे स्वरुप नसल्यामुळे या भागात एकही एसटी बस सेवा कार्यरत न्हवती. या भागात माओवाद्यांची हुकूमत चालत होती. दोन वर्षांपूर्वी गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या या भागात आपला डॉमिनन्स वाढवण सुरू केले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानेही गट्टा ते वांगेतुरी दरम्यान ३२ किलोमीटर रस्ता निर्माण केला. त्यानंतर आता गट्टा ते वांगेतुरी मार्गावर पक्का मार्ग तयार झाला असून स्वातंत्र्याच्या साडेसात दशकानंतर या मार्गावर लालपरी धावली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते या बससेवेचे उद्घाटन झाले असून उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः एसटी बसमधून गावकऱ्यांसोबत प्रवास केला. त्याचबरोबर बसमधील इतर प्रवाशांसोबत संवाद साधला.


Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य