Winter diet: शरीराला आतून उष्ण ठेवतील किचनमध्ये ठेवलेले हे ५ मसाले

  44

मुंबई: जसजसे तापमान कमी होत जाते तसतसे शरीरात उष्णता वाढवणाऱ्या पदार्थांची गरज भासते. थंडी सुरू झाली की आपण जसे स्वेटर घालतो त्याच प्रमाणे शरीराला आतून उष्णता देण्याचीही गरज असते. खरंतर अनेक पद्धती आहेत ज्यामुळे आपले शरीर आपण आतून गरम ठेवू शकतो. यामुळे आरोग्य चांगले राहील.


तुम्ही ऐकले असेल की जेवणातून आपल्याला ऊर्जा मिते. मात्र खाण्यातून असे काही पदार्थ गेले पाहिजेत की ज्यामुळे शरीराचे तापमान वाढते. खरंतर शरीराचे तापमान वाढवण्यासाठी खाण्यामध्ये काही मसाले वापरले पाहिजेत. यामुळे शरीरात उष्णता वाढवते.



जिरे


आपण जिऱ्याचा वापर फोडणीसाठी करतो. मात्र थंडीच्या दिवसांत जिऱ्याचे वापर केल्याने शरीर उष्ण राहण्यास मदत होते. पाण्यामध्ये जिरे उकळून प्यायल्याने फायदा होतो.



आले


थंडीत आपण आल्याचा वापर विविध पद्धतीने करतो. चहामध्ये आले वापरले जाते. अथवा काढ्यामध्येही आल्याचा वापर केला जातो.



दालचिनी


तुम्ही मसालेदार चहाबद्दल ऐकले असेल. दालचिनी चहामध्ये टाकल्याने स्वाद वाढतो आणि शरीर गरम राहण्यास मदत होते. दालचिनीमुळे रक्त प्रवाह नियंत्रित राहण्यास मदत होते.



काळी मिरी


काळी मिरीला चहा, भाज्या तसेच सलाडमध्येही वापरू शकतो. हे खाल्ल्याने शरीराचे तापमान वाढतो. यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो.



वेलची


थंडीच्या दिवसांत वेलचीचा चहा पिणे चांगले असते. यामुळे केवळ शरीर गरमच राहत नाही तर हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.

Comments
Add Comment

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर

आयोडीन युक्त मिठाचा वापर करा, आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई: जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी २५ मे रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश थायरॉईड रोगांबद्दल जागरूकता वाढवणे