Winter diet: शरीराला आतून उष्ण ठेवतील किचनमध्ये ठेवलेले हे ५ मसाले

मुंबई: जसजसे तापमान कमी होत जाते तसतसे शरीरात उष्णता वाढवणाऱ्या पदार्थांची गरज भासते. थंडी सुरू झाली की आपण जसे स्वेटर घालतो त्याच प्रमाणे शरीराला आतून उष्णता देण्याचीही गरज असते. खरंतर अनेक पद्धती आहेत ज्यामुळे आपले शरीर आपण आतून गरम ठेवू शकतो. यामुळे आरोग्य चांगले राहील.


तुम्ही ऐकले असेल की जेवणातून आपल्याला ऊर्जा मिते. मात्र खाण्यातून असे काही पदार्थ गेले पाहिजेत की ज्यामुळे शरीराचे तापमान वाढते. खरंतर शरीराचे तापमान वाढवण्यासाठी खाण्यामध्ये काही मसाले वापरले पाहिजेत. यामुळे शरीरात उष्णता वाढवते.



जिरे


आपण जिऱ्याचा वापर फोडणीसाठी करतो. मात्र थंडीच्या दिवसांत जिऱ्याचे वापर केल्याने शरीर उष्ण राहण्यास मदत होते. पाण्यामध्ये जिरे उकळून प्यायल्याने फायदा होतो.



आले


थंडीत आपण आल्याचा वापर विविध पद्धतीने करतो. चहामध्ये आले वापरले जाते. अथवा काढ्यामध्येही आल्याचा वापर केला जातो.



दालचिनी


तुम्ही मसालेदार चहाबद्दल ऐकले असेल. दालचिनी चहामध्ये टाकल्याने स्वाद वाढतो आणि शरीर गरम राहण्यास मदत होते. दालचिनीमुळे रक्त प्रवाह नियंत्रित राहण्यास मदत होते.



काळी मिरी


काळी मिरीला चहा, भाज्या तसेच सलाडमध्येही वापरू शकतो. हे खाल्ल्याने शरीराचे तापमान वाढतो. यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो.



वेलची


थंडीच्या दिवसांत वेलचीचा चहा पिणे चांगले असते. यामुळे केवळ शरीर गरमच राहत नाही तर हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.

Comments
Add Comment

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर