जेव्हा भारतीय कर्णधाराने मेलबर्न कसोटीनंतर घेतली होती निवृत्ती...१० वर्षांनी पुन्हा तेच होणार?

मुंबई : भारतीय संघ(team india) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील चौथा सामना मेलबर्नमध्ये झाला. हा सामना ऑस्ट्रेलियाने १८४ धावांनी जिंकला. यामुळे यजमान संघ पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा आघाडीवर आहे. भारतीय संघाला विजयासाठी ३४० धावांचे आव्हान मिळाले होते.


या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तिबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे की रोहित सिडनी सामन्यानंतर निवृत्ती घेईल. हे असेच वातावरण याआधीही होते. १० वर्षांपूर्वी मेलबर्न कसोटीनंतर असेच वातावरण बनले होते. तेव्हा भारताचा कर्णधार असलेला महेंद्रसिंग धोनीने सामन्यानंतर कसोटीतून निवृत्ती घेतली होती.



धोनीने ३० डिसेंबर २०१४मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतली होती. तेव्हा शेवटच्या कसोटीसाठी विराट कोहलीच्या हातात कमान सोपवण्यात आली होती. आताही असेच काहीसे वातावरण झाले आहे. फरक इतकाच आहे की भारत-ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटी अनिर्णीत झाली होती. यानंतर धोनीने निवृत्तीची घोषणा केली होती.


मात्र यावेळेस मेलबर्न कसोटीत भारताचा पराभव झाला आहे. तर कर्णधार रोहितने निवृत्ती घेतली आहे. मात्र वातावरण तसेच काहीतरी बनत आहे. कर्णधाराच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू आहेत. २००५मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या धोनीने आपल्या ९ वर्षांच्या करिअरमध्ये ९० कसोटी सामने खेळले. यात ६ शतके आणि ३३ अर्धशतके ठोकली. यात त्याने ४८७६ धावा केल्या.


धोनीने ६० कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले. यात २७ कसोटी सामने जिंकले. अखेरीस धोनीने १५ ऑगस्ट २०२०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

Comments
Add Comment

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला