Ravindra Waikar car accident : खासदार वायकरांच्या कारला अपघात

मुंबई : शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या कारला अपघात झाला. मुंबईतील जोगेश्वरी परिसरात एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वारानजीक पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ हा अपघात झाला. एका आयशर टेम्पोची आणि वायकरांच्या कारची धडक झाली. या अपघातात जीवितहानी झालेली नाही.



अपघात झाला त्यावेळी कारमध्ये खासदार रवींद्र वायकर होते. ते सुखरुप आहेत. अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.



कोण आहेत रवींद्र वायकर ?

रवींद्र वायकर हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार आहेत. याआधी ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते आणि मुंबईतील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्यरत होते. पण एप्रिल २०२४ मध्ये त्यांनी शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला. रवींद्र वायकर १९९२ पासून सलग चार वेळा मुंबई महापालिकेत नगरसेवकपदाची निवडणूक जिंकले आहेत. ते २००६ पासून मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष अध्यक्ष झाले. त्यांनी २००९ मध्ये पहिल्यांदा विधानसभेत आमदार म्हणून प्रवेश केला. ते २०१४ मध्ये फडणवीस सरकारमध्ये गृहनिर्माण तसेच उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री होते. रवींद्र वायकर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांचा पराभव केला. रवींद्र वायकर हे लोकसभा निवडणुकीत ४८ मतांनी विजयी झाले.
Comments
Add Comment

मंडाळे आशियातील सर्वात मोठा आणि आधुनिक मेट्रो डेपो !

मुंबई : मुंबईच्या मेट्रो वाहतूक यंत्रणेत नवा अध्याय सुरू होत आहे. डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो लाईन २ बी साठी मंडाळे

“जो जीता वही सिकंदर” शरद पवारांच्या बिनबुडाच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार!

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र समोर

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच