Ravindra Waikar car accident : खासदार वायकरांच्या कारला अपघात

Share

मुंबई : शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या कारला अपघात झाला. मुंबईतील जोगेश्वरी परिसरात एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वारानजीक पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ हा अपघात झाला. एका आयशर टेम्पोची आणि वायकरांच्या कारची धडक झाली. या अपघातात जीवितहानी झालेली नाही.

अपघात झाला त्यावेळी कारमध्ये खासदार रवींद्र वायकर होते. ते सुखरुप आहेत. अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

कोण आहेत रवींद्र वायकर ?

रवींद्र वायकर हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार आहेत. याआधी ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते आणि मुंबईतील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्यरत होते. पण एप्रिल २०२४ मध्ये त्यांनी शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला. रवींद्र वायकर १९९२ पासून सलग चार वेळा मुंबई महापालिकेत नगरसेवकपदाची निवडणूक जिंकले आहेत. ते २००६ पासून मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष अध्यक्ष झाले. त्यांनी २००९ मध्ये पहिल्यांदा विधानसभेत आमदार म्हणून प्रवेश केला. ते २०१४ मध्ये फडणवीस सरकारमध्ये गृहनिर्माण तसेच उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री होते. रवींद्र वायकर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांचा पराभव केला. रवींद्र वायकर हे लोकसभा निवडणुकीत ४८ मतांनी विजयी झाले.

Recent Posts

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

14 minutes ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

30 minutes ago

शापित चित्रकेतू झाला वृत्रासूर

भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…

44 minutes ago

प्रतिज्ञापत्रातील साक्षीदार

अ‍ॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…

54 minutes ago

गुणसुंदर…

पूनम राणे अधिकाराची खुर्ची आपल्याला ईश्वरी कृपेने मिळते. त्या खुर्चीला शोभा कशी आणायची, हे आपल्या…

1 hour ago

मैत्र जीवांचे…

राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…

1 hour ago