IND vs AUS: मेलबर्न कसोटीत भारत खराब स्थितीत, लंचपर्यंत गमावले ३ विकेट

  72

मेलबर्न: भारत आणि ऑस्ट्रेलिया(IND vs AUS) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकतील चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड खेळवला जात आहे. या सामन्यातील पाचव्या आणि शेवटच्या दिवसाचा खेळ सुरू आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताला विजयासाठी ३४० धावांचे आव्हान दिले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ३ विकेट गमावत ३३ धावा केल्यात. यशस्वी जायसवाल क्रीझवर आहे. भारताला जर विजय मिळवायचा असेल तर ९२ षटकांत हे आव्हान पार करावे लागेल.


ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २३४ धावांवर आटोपला. भारताकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने ५ विकेट घेतल्या. याआधी भारतीय संघाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या होत्या. भारताकडून नितीश कुमार रेड्डीने ११४ धावांचे योगदान दिले होते. सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या संघाने ४७४ धावा केल्या होत्या. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारावर ऑस्ट्रेलियाला १०५ धावांची आघाडी मिळाली होती.



आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात धीमी झाली. रोहित शर्मा आणि यशस्वी जायसवालने नव्या बॉलवर मोठे शॉट्स मारण्याचे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे भारताला १६ षटकांत केवळ २५ धावा करता आल्या. रोहित शर्मा ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर केएल राहुलही झटपट बाद झाला. राहुलला खातेही खोलता आले नाही. तर विराट कोहली ५ धावा करून झेलबाद झाला.

Comments
Add Comment

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे

ICC Rankings : आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतून रोहित-विराटची नावे गायब

दुबई : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची नावे आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतून गायब