IND vs AUS: मेलबर्न कसोटीत भारत खराब स्थितीत, लंचपर्यंत गमावले ३ विकेट

मेलबर्न: भारत आणि ऑस्ट्रेलिया(IND vs AUS) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकतील चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड खेळवला जात आहे. या सामन्यातील पाचव्या आणि शेवटच्या दिवसाचा खेळ सुरू आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताला विजयासाठी ३४० धावांचे आव्हान दिले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ३ विकेट गमावत ३३ धावा केल्यात. यशस्वी जायसवाल क्रीझवर आहे. भारताला जर विजय मिळवायचा असेल तर ९२ षटकांत हे आव्हान पार करावे लागेल.


ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २३४ धावांवर आटोपला. भारताकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने ५ विकेट घेतल्या. याआधी भारतीय संघाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या होत्या. भारताकडून नितीश कुमार रेड्डीने ११४ धावांचे योगदान दिले होते. सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या संघाने ४७४ धावा केल्या होत्या. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारावर ऑस्ट्रेलियाला १०५ धावांची आघाडी मिळाली होती.



आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात धीमी झाली. रोहित शर्मा आणि यशस्वी जायसवालने नव्या बॉलवर मोठे शॉट्स मारण्याचे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे भारताला १६ षटकांत केवळ २५ धावा करता आल्या. रोहित शर्मा ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर केएल राहुलही झटपट बाद झाला. राहुलला खातेही खोलता आले नाही. तर विराट कोहली ५ धावा करून झेलबाद झाला.

Comments
Add Comment

IPL 2026 : आयपीएल २०२६ ला दुखापतींचं ग्रहण; अनेक क्रिकेटपटूंच्या दुखापतींमुळे फ्रँचायझींच्या चिंतेत वाढ

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्यास केवळ एक आठवडा शिल्लक असतानाच, अनेक संघ दुखापतींशी झुंजत आहेत. १० पैकी आठ

Jasprit Bumrah : आयसीसी टी-२० क्रमवारी जसप्रीत बुमराहची टॉप ५ मध्ये नोंद

मुंबई : भारताने ८ मार्च रोजी टी२० विश्वचषक जिंकल्यापासून एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि

Gudi Padwa 2026 : सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार आणि अजिंक्य रहाणेने यांच्यासह अनेक खेळाडूंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर, नुकताच भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा सूर्यकुमार यादव, माजी फिरकी गोलंदाज

SRH IPL 2026 : ईशान किशन आणि अभिषेक शर्मावर हैदराबाद संघाने टाकली मोठी जबाबदारी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या आधी, सनरायझर्स हैदराबादने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या नुकत्याच

खेळाडूंची ‘A+’ श्रेणीच रद्द? BCCIचा मोठा निर्णय; बुमराह- जडेजाच्या मानधनात होणार घट

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय २०२५-२६ हंगामासाठी क्रिकेटपटूंच्या वार्षिक करार आणि मानधन

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील