IND vs AUS: मेलबर्न कसोटीत भारत खराब स्थितीत, लंचपर्यंत गमावले ३ विकेट

  45

मेलबर्न: भारत आणि ऑस्ट्रेलिया(IND vs AUS) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकतील चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड खेळवला जात आहे. या सामन्यातील पाचव्या आणि शेवटच्या दिवसाचा खेळ सुरू आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताला विजयासाठी ३४० धावांचे आव्हान दिले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ३ विकेट गमावत ३३ धावा केल्यात. यशस्वी जायसवाल क्रीझवर आहे. भारताला जर विजय मिळवायचा असेल तर ९२ षटकांत हे आव्हान पार करावे लागेल.


ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २३४ धावांवर आटोपला. भारताकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने ५ विकेट घेतल्या. याआधी भारतीय संघाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या होत्या. भारताकडून नितीश कुमार रेड्डीने ११४ धावांचे योगदान दिले होते. सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या संघाने ४७४ धावा केल्या होत्या. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारावर ऑस्ट्रेलियाला १०५ धावांची आघाडी मिळाली होती.



आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात धीमी झाली. रोहित शर्मा आणि यशस्वी जायसवालने नव्या बॉलवर मोठे शॉट्स मारण्याचे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे भारताला १६ षटकांत केवळ २५ धावा करता आल्या. रोहित शर्मा ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर केएल राहुलही झटपट बाद झाला. राहुलला खातेही खोलता आले नाही. तर विराट कोहली ५ धावा करून झेलबाद झाला.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी