ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष, पहिले महापौर सतीश प्रधान यांचे निधन

ठाणे : ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष नंतर ठाणे महापालिका झाल्यावर या मनपाचे पहिले महापौर झालेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सतीश प्रधान (८५) यांचे रविवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी ठाण्यात सतीश प्रधान यांचे अंत्यदर्शन घेतले.



सतीश प्रधान यांच्या कार्यकाळात १९८० मध्ये ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापना झाली. शिवसेनेचे माजी खासदार, ठाणे महापालिकेचे पहिले महापौर, ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवलेल्या सतीश प्रधान यांच्या कार्यकाळात ठाणे शहरात महापौर मॅरेथॉन स्पर्धा सुरू झाली. सतीश प्रधान यांच्या नेतृत्वात ठाणे शहरात अनेक विकासकामं झाली. शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत करण्याचे कामंही सतीश प्रधान यांच्या कार्यकाळात झाले.



शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सतीश प्रधान यांच्या पश्चात मुलगा कमलेश प्रधान, सून डॉ. मानसी प्रधान, कन्या, जावई आणि दोन नाती असे कुटुंब आहे.
Comments
Add Comment

राजपत्रात नावे घोषित न झाल्याने कोकण भवनातील नगरसेवकांची नोंदणीच लांबली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचा महापौर कोण होणार आणि कधी होणार याची चर्चा रंगली असली तरी प्रत्यक्षात अद्यापही

मुंबई महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर होणार.. जिथे युतीमध्ये लढलो तिथे महायुतीचा महापौर होणार -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्पष्ट

मुंबई : शिवसेना आणि भाजप हे मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र निवडणूक लढले असून मुंबईत महायुतीचा महापौर होईल

कांदिवली–बोरिवली सहावा ट्रॅक सुरू; महिन्याभराच्या ब्लॉकनंतर पश्चिम रेल्वेने घेतला मोकळा श्वास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सततच्या ब्लॉकमुळे हैराण झालेल्या प्रवाशांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे.

मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार राऊतांनी दिवास्वप्ने पाहू नयेत - भाजपचा प्रहार

मुंबई : महापालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेनेच्या महायुतीच्या विकासाच्या धोरणाला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबईच्या महापौर पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेत आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू असताना, मुख्यमंत्री देवेंद्र

उबाठा सोडून शिवसेना,भाजपात गेलेल्या कुणी मिळवली विजयश्री

उबाठात राहूनही ९ जणांची उमेदवारी नाकारली, ९ जणांचा पराभव मुंबई (सचिन धानजी) : शिवसेनेत जुलै २०२२ रोजी मोठा राजकीय