Punjab Bandh : शेतकऱ्यांचा पंजाब बंद; १५० ट्रेन रद्द!

चंदीगढ : काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा (गैरराजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या वतीने पंजाबमध्ये ‘रेले रोको’ आंदोलनाची हाक दिली होती. यावेळी शेतकऱ्यांनी विविध रेल्वे मार्गांवर ठिय्या देऊन रेल्वे मार्ग रोखले होते. त्यानंतर आता पुन्हा शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. आज किसान मजदूर मोर्चा (KMM) आणि संयुक्त किसान मोर्चा यांनी पंजाब बंदची हाक दिली आहे.



शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल हे किमान आधारभूत मूल्यासाठी कायदेशीर हमीसह आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी केंद्रावर दबाव आणण्यासाठी २६ नोव्हेंबरपासून खनौरी सीमेवर आमरण उपोषणासाठी बसले आहेत. मात्र अद्यापही केंद्र सरकारने काहीच निर्णय न शेतकऱ्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका धारण केली आहे. शेतकऱ्यांनी पंजाब बंदची हाक दिली असून सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅक रोखून प्रवासी आणि मालगाड्यांची वाहतूक विस्कळीत करणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने १५० ट्रेन रद्द केल्या आहेत. मात्र यामुळे प्रवाशांचा खोळंबा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



कोणत्या ट्रेन रद्द?


उत्तर रेल्वेने ३ वंदे भारत एक्स्प्रेससह नवी दिल्लीहून कालका, चंदीगड आणि अमृतसरकडे धावणाऱ्या ३ शताब्दी एक्स्प्रेस आणि पंजाब, हरियाणा, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये धावणाऱ्या अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.


दरम्यान, यावेळी प्रवाशांना त्रास न होण्यासाठी अंबाला पोलिसांनी दिल्ली आणि चंदीगड दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना NH-44 मार्गे पंचकुला, बरवाला, मुल्लाना, यमुनानगर, रादौर, लाडवा आणि पिपली येथे पर्यायी मार्गाने जाण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

फॉलोअर्सच्या शर्यतीत मुलांचं बालपण धोक्यात, सुधा मूर्तींची सरकारकडे महत्त्वाची मागणी

नवी दिल्ली : इंटरनेटवर आज असंख्य रील्स आणि व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यात लहान मुलांचा थेट कंटेंट म्हणून वापर केला

उड्डाणं रद्द, तिकीटदर वाढले; हवाई प्रवासातील गोंधळावर सरकारची मोठी कारवाई

नवी दिल्ली : इंडिगोच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे मागील काही दिवसांपासून देशात मोठे विमान प्रवास

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३