Jalna : क्रिकेट खेळताना आला अ‍ॅटॅक, ३२ वर्षीय फलंदाजाचा खेळपट्टीवर मृत्यू

  77

जालना : आनंदासाठी आणि फिटनेससाठी मैदानी खेळ खेळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून तरुणाईला सतत दिला जातो. पण धकाधकीच्या जीवनात अनेकजण तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. सकस आहाराऐवजी फास्टफूडवर जगतात. नियमित व्यायाम करणे टाळतात. यामुळे एखाद्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त धावपळ झाली तरी हृदयावर ताण येतो. रक्तदाबात चढउतार सुरू होतात. श्वास घेण्यास त्रास होतो. या एरवी छोट्या दिसणाऱ्या समस्यांकडे वेळेत लक्ष दिले नाही तर काही वेळा या समस्या जीवघेण्या ठरतात. काहीसा असाच प्रकार जालना जिल्ह्यात घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.





क्रिकेट खेळताना धाव काढून झाल्यावर दोन फलंदाज धावपट्टीवरच एकमेकांशी बोलत होते. नंतर एक फलंदाज फलंदाजीसाठी गेला तर दुसरा अर्थात नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज त्याच्या क्रिझच्या दिशेने जाऊ लागला. पण आधीचे श्रम त्याला त्रासदायक ठरले. तो क्रिझकडे जात असताना छातीत असह्य वेदना होऊ लागल्यामुळे खेळपट्टीवरच कोसळला. थोड्याच वेळात या खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सहकारी खेळाडूंनी डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी तपासणी करुन खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या खेळाडूचे वय फक्त ३२ वर्षे एवढे होते. जालना शहरात एका क्रिकेट स्पर्धेदरम्यान खेळपट्टीवर त्याचा मृत्यू झाला.



आयोजकांनी हृदयविकाराच्या झटका आलेल्या खेळाडूला रुग्णालयात नेले पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. अवघ्या ३२ वर्षांच्या उमद्या खेळाडूने प्राण गमावले होते.
Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक