Australia vs India : मेलबर्नमध्ये भारताचा दारुण पराभव, मालिकेत ऑस्ट्रेलियाने घेतली आघाडी

मेलबर्न : बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेत चार कसोटी सामन्यांनंतर ऑस्ट्रेलियाने २ - १ अशी आघाडी घेतली आहे. मेलबर्न कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने हा कसोटी सामना १८४ धावांनी जिंकला. भारताने पर्थमधील कसोटी जिंकली तर ऑस्ट्रेलियाने अॅडलेड आणि मेलबर्नची कसोटी जिंकली. ब्रिस्बेन येथील कसोटी अनिर्णित राहिली. आता सिडनीत होणाऱ्या कसोटीत भारताचा विजय झाल्यास मालिक बरोबरीत सुटेल पण हा सामना अनिर्णित राहिला अथवा भारताने गमावला तर ऑस्ट्रेलिया यंदाची बॉर्डर - गावसकर ट्रॉफी जिंकेल.



मेलबर्न कसोटीत नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४७४ आणि दुसऱ्या डावात सर्वबाद २३४ धावा केल्या. भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३६९ आणि दुसऱ्या डावात सर्वबाद १५५ धावा केल्या. भारताकडून दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ८४ धावा केल्या. रिषभ पंतने ३० धावा केल्या. इतर फलंदाज वैयक्तिक दोन आकडी धावा पण करू शकले नाही. केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज शून्यावर बाद झाले. कर्णधार रोहित शर्मा फक्त नऊ धावा करू शकला तर स्टार फलंदाज विराट कोहली पाच धावा करुन बाद झाला. रवींद्र जडेजाने २, नितीश रेड्डीने १, वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ५, आकाश दीपने ७ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलंड या दोघांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. नॅथन लायनने दोन तर त्राविस हेड आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी एक बळी घेतला.



ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने मेलबर्न कसोटच्या पहिल्या डावात ४९ आणि दुसऱ्या डावात ४१ धावा केल्या. त्याने दोन्ही डावात भारताच्या प्रत्येकी तीन फलंदाजांना बाद केले. या कामगिरीमुळे त्याला सामनावीर अर्थात मॅन ऑफ द मॅच (प्लेअर ऑफ द मॅच) या पुरस्काराने गौरविण्यात आले.
Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण