Murud Beach : पर्यटकांची मुरुडकडे पाठ! वाहनांमुळे ठिकठिकाणी ट्राफिक जाम

मुरुड : नाताळाच्या सणापासून सलग सुट्टी असल्याने जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. जंजिरा किल्ला पाहून झाल्यानंतर पर्यटक मुरुड मधून पळ काढत आहेत. यावर्षी लॉजिंग हॉटेल व्यवसाय तोट्यात गेले आहेत. मुरुड मध्ये पर्यटन महोत्सव नसल्याने पर्यटकांनी बुकिंग केली नाही असे लॉज मालक व चालकांनी सांगितले. त्यामुळे पर्यटकांनी मुरुडकडे पाठ फिरवल्याचे लॉज व हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी वाढलेल्या वाहनांमुळे मुरुड मध्ये ठीक ठिकाणी ट्राफिक जाम झाल्याचे दिसून आले.



नाताळाच्या सणापासून सुट्ट्या असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी बाहेर पडतात. यामध्ये मुरुड हा जगप्रसिद्ध झाला आहे, याची ‘मिनी गोवा’ म्हणून ओळख झालेली आहे, त्यामुळे मुंबई पुण्यापासून अगदी जवळ असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात मुरुड मध्ये जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येत आहेत. नेहमी प्रमाणे यावर्षी मुरुड मध्ये पर्यटन महोत्सव नसल्याने पर्यटकांनी लॉजिंग मध्ये बुकिंग केली नसल्याचे लॉज चालक गौरव हणुमंते यांनी सांगितले. किल्ला पाहण्यासाठी वाढलेल्या वाहनांच्या रहदारीमुळे मुरुड बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात ट्राफिक होत आहे.


मुरुड समुद्रकिनारी सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्राफिक होत आहे, मुरुड मच्छीमार मार्केट या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात, नांदगाव बाजारपेठेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्राफिक होत असल्याचे दिसून आले. मुरुड मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक आले पण ते थांबलेच नाही न थांबतानाच निघून गेले याचे कारण मुरुड नगरपरिषदेतर्फे दरवर्षी पर्यटन महोत्सव आयोजित केला जातो तो यंदा नसल्याने पर्यटकांनी मुरुड कडे मोठ्या प्रमाणात पाठ फिरवली असल्याने लॉज मालक, चालक व हॉटेल व्यवसायिक हे मोठ्या नुकसानीत गेले आहेत.

Comments
Add Comment

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह