Murud Beach : पर्यटकांची मुरुडकडे पाठ! वाहनांमुळे ठिकठिकाणी ट्राफिक जाम

मुरुड : नाताळाच्या सणापासून सलग सुट्टी असल्याने जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. जंजिरा किल्ला पाहून झाल्यानंतर पर्यटक मुरुड मधून पळ काढत आहेत. यावर्षी लॉजिंग हॉटेल व्यवसाय तोट्यात गेले आहेत. मुरुड मध्ये पर्यटन महोत्सव नसल्याने पर्यटकांनी बुकिंग केली नाही असे लॉज मालक व चालकांनी सांगितले. त्यामुळे पर्यटकांनी मुरुडकडे पाठ फिरवल्याचे लॉज व हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी वाढलेल्या वाहनांमुळे मुरुड मध्ये ठीक ठिकाणी ट्राफिक जाम झाल्याचे दिसून आले.



नाताळाच्या सणापासून सुट्ट्या असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी बाहेर पडतात. यामध्ये मुरुड हा जगप्रसिद्ध झाला आहे, याची ‘मिनी गोवा’ म्हणून ओळख झालेली आहे, त्यामुळे मुंबई पुण्यापासून अगदी जवळ असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात मुरुड मध्ये जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येत आहेत. नेहमी प्रमाणे यावर्षी मुरुड मध्ये पर्यटन महोत्सव नसल्याने पर्यटकांनी लॉजिंग मध्ये बुकिंग केली नसल्याचे लॉज चालक गौरव हणुमंते यांनी सांगितले. किल्ला पाहण्यासाठी वाढलेल्या वाहनांच्या रहदारीमुळे मुरुड बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात ट्राफिक होत आहे.


मुरुड समुद्रकिनारी सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्राफिक होत आहे, मुरुड मच्छीमार मार्केट या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात, नांदगाव बाजारपेठेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्राफिक होत असल्याचे दिसून आले. मुरुड मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक आले पण ते थांबलेच नाही न थांबतानाच निघून गेले याचे कारण मुरुड नगरपरिषदेतर्फे दरवर्षी पर्यटन महोत्सव आयोजित केला जातो तो यंदा नसल्याने पर्यटकांनी मुरुड कडे मोठ्या प्रमाणात पाठ फिरवली असल्याने लॉज मालक, चालक व हॉटेल व्यवसायिक हे मोठ्या नुकसानीत गेले आहेत.

Comments
Add Comment

थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवणं पडणार महागात; RTO नवे नियम लागू

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या सेलिब्रेशनदरम्यान वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्यांवर आता थेट कारवाई

जेलमधून लढवणार निवडणुक, बंडू आंदेकरचा नवा राजकीय प्रवेश

पुणे : पुण्यातील गँगवॉरला कारणीभूत ठरलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरने आता राजकीय

लातूरकरांचा प्रवास सुसाट! राज्य सरकारची मुंबई-लातूर महामार्गाला संमती, संरेखनेचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई ते लातूर

आचारसंहितेमुळे रखडलेली सोडत लवकरच होणार; पुणे मंडळाच्या सभापतींनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट

पुणे: म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए हद्द तसेच सोलापूर,

विहिरीतील मोटार काढताना काळाचा घाला; धाराशिवमध्ये बाप-लेकासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र

‘या’ उमेदवारांना मत देणार नाही; नाशिकमधील गावकऱ्यांचा ठाम निर्णय

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची