Matheran E-rickshaw : ई- रिक्षाच्या संख्येत ताबडतोब वाढ करावी पर्यटकांची मागणी!

रिक्षा उपलब्ध झाल्यास नागरिकांचा प्रवास हाेणार सुकर


माथेरान : नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी माथेरानला पसंती दिली आहे. परंतु वाहतुकीच्या गहन समस्यांना सामोरे जात प्रवास करावा लागत असल्यामुळे लवाजम्यासह आलेल्या पर्यटकांची त्रेधातिरपीट उडत आहे.


ई -रिक्षाची सुविधा (e-rickshaw) उपलब्ध झाल्यामुळे कधी नव्हे एवढी पर्यटकांची गर्दी याठिकाणी पाहावयास मिळत आहे. ई रिक्षाच्या स्टँडवर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रहदारीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण न करता कोणत्याही बंदोबस्ताशिवाय ई -रिक्षा संघटना उत्तम प्रकारे सेवा देत आहेत. विशेष म्हणजे या ई रिक्षाच्या स्वस्त आणि सुरक्षित सेवेचा लाभ घेण्यासाठी पर्यटक सुध्दा आपला अमूल्य वेळ खर्च करून ताटकळत उभे राहून चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत.



या सेवेचा पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाला असून फक्त वीस रिक्षांच्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून देणे चालकांना त्रासदायक बनले आहे. संघटनेची त्यांच्या हक्काची उर्वरीत एकूण ७४ बाकी असलेल्या ई- रिक्षांची मागणी आहे. या सर्व रिक्षा उपलब्ध झाल्यास सर्वाना प्रवास सुखकर होणार असून यापुढेही इथे मोठया प्रमाणावर पर्यटन क्रांती घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


शासनाने आणि संबंधित समितीच्या अधिकाऱ्यांनी लवकरच ई -रिक्षांच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे. शाळेच्या दिवसात शालेय विद्यार्थ्यांना वीस पैकी पंधरा रिक्षा सेवा देत असतात तर, उर्वरित पाच रिक्षा प्रवाशांना अपुऱ्या पडतात. मुख्य म्हणजे ई- रिक्षाला ज्या लोकांचा आजही विरोध कायम आहे तीच मंडळी प्रामुख्याने या सेवेचा लाभ घेत आपल्या कुटुंबातील सदस्यांना लाभ घेण्यास सांगत आहेत. त्यातच अप्रत्यक्षपणे ई रिक्षाला विरोध करणारी काही राजकीय पक्षांची नेतेमंडळी सुध्दा स्वतःला या सेवेचा लाभ घेताना कुणी कानपिचक्या देईल यासाठी लाजून आपल्या हॉटेल जवळ मर्जीतील चालकांमार्फत ई- रिक्षा मागवून लाभ घेताना दिसत आहेत. (Matheran E-rickshaw)



ई रिक्षाची संख्या कमी असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल


गर्दीच्या वेळी पर्यटकांना ई- रिक्षाच्या रांगेचे नियोजन मी निस्वार्थीपणे करीत असतो. ई रिक्षाची संख्या कमी असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिलांना तासनतास ई- रिक्षाची वाट पहावी लागते यासाठी सनियंत्रण समितीने ई रिक्षाची संख्या वाढवावी. पायलट प्रोजेक्टचा कालावधी पूर्ण झाला आहे, असे पर्यटकांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य