Matheran E-rickshaw : ई- रिक्षाच्या संख्येत ताबडतोब वाढ करावी पर्यटकांची मागणी!

रिक्षा उपलब्ध झाल्यास नागरिकांचा प्रवास हाेणार सुकर


माथेरान : नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी माथेरानला पसंती दिली आहे. परंतु वाहतुकीच्या गहन समस्यांना सामोरे जात प्रवास करावा लागत असल्यामुळे लवाजम्यासह आलेल्या पर्यटकांची त्रेधातिरपीट उडत आहे.


ई -रिक्षाची सुविधा (e-rickshaw) उपलब्ध झाल्यामुळे कधी नव्हे एवढी पर्यटकांची गर्दी याठिकाणी पाहावयास मिळत आहे. ई रिक्षाच्या स्टँडवर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रहदारीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण न करता कोणत्याही बंदोबस्ताशिवाय ई -रिक्षा संघटना उत्तम प्रकारे सेवा देत आहेत. विशेष म्हणजे या ई रिक्षाच्या स्वस्त आणि सुरक्षित सेवेचा लाभ घेण्यासाठी पर्यटक सुध्दा आपला अमूल्य वेळ खर्च करून ताटकळत उभे राहून चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत.



या सेवेचा पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाला असून फक्त वीस रिक्षांच्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून देणे चालकांना त्रासदायक बनले आहे. संघटनेची त्यांच्या हक्काची उर्वरीत एकूण ७४ बाकी असलेल्या ई- रिक्षांची मागणी आहे. या सर्व रिक्षा उपलब्ध झाल्यास सर्वाना प्रवास सुखकर होणार असून यापुढेही इथे मोठया प्रमाणावर पर्यटन क्रांती घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


शासनाने आणि संबंधित समितीच्या अधिकाऱ्यांनी लवकरच ई -रिक्षांच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे. शाळेच्या दिवसात शालेय विद्यार्थ्यांना वीस पैकी पंधरा रिक्षा सेवा देत असतात तर, उर्वरित पाच रिक्षा प्रवाशांना अपुऱ्या पडतात. मुख्य म्हणजे ई- रिक्षाला ज्या लोकांचा आजही विरोध कायम आहे तीच मंडळी प्रामुख्याने या सेवेचा लाभ घेत आपल्या कुटुंबातील सदस्यांना लाभ घेण्यास सांगत आहेत. त्यातच अप्रत्यक्षपणे ई रिक्षाला विरोध करणारी काही राजकीय पक्षांची नेतेमंडळी सुध्दा स्वतःला या सेवेचा लाभ घेताना कुणी कानपिचक्या देईल यासाठी लाजून आपल्या हॉटेल जवळ मर्जीतील चालकांमार्फत ई- रिक्षा मागवून लाभ घेताना दिसत आहेत. (Matheran E-rickshaw)



ई रिक्षाची संख्या कमी असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल


गर्दीच्या वेळी पर्यटकांना ई- रिक्षाच्या रांगेचे नियोजन मी निस्वार्थीपणे करीत असतो. ई रिक्षाची संख्या कमी असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिलांना तासनतास ई- रिक्षाची वाट पहावी लागते यासाठी सनियंत्रण समितीने ई रिक्षाची संख्या वाढवावी. पायलट प्रोजेक्टचा कालावधी पूर्ण झाला आहे, असे पर्यटकांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Election : मतदार यादी पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम यादी १९ ऑक्टोबरला

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे

Firoz Baba Case : फिरोज बाबा प्रकरणात तपासाची गती; ठाणे पोलिसांकडून पाच जणांना समजपत्र

ठाणे : फिरोज बाबा प्रकरणातील तपासाला वेग आला असून, ठाकरे शिवसेनेचे (Shevsena) माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे

Nanded Suicide : स्टेटस ठेवलं अन् शिक्षकाची दोन मुलांसह आत्महत्या; पोलीस तपास सुरु

नांदेडमध्ये शिक्षकाची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या; व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे खळबळ नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून