Pune-Solapur Highway : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाची पूर्णपणे दुर्दशा!

  67

लाखो रुपयांची टोलवसुली; पण देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष


पुणे : सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने या टोल रोडची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. लाखो रुपयांची टोल वसुली केली जाते, मात्र देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षित प्रवासाबाबत राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाला काही घेणे - देणे राहिलेले नाही, असे चित्र दिसून येत आहे.



या महामार्गावर जागोजागी खड्डे पडले असून रस्ता उखडलेला आहे. पुणे ते सोलापूर या दरम्यान साधारण २६० किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग आहे. दौंड तालुक्यात सन २०१० ते २०१२ दरम्यान महामार्गाचे रुंदीकरण झाले. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. रुंदीकरणानंतर रस्ता मोठा झाला, वाहनांचा वेग वाढला. टोल वसुली जोमाने सुरू झाली. मात्र, अपघात कमी झाले नाहीत. महामार्गाची दुरवस्था अथवा रस्त्यावर खड्डे पडल्यास त्याची गांभीर्याने व तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे असते. मात्र, तसे होत नाही. महामार्गाच्या मुख्य लेन आणि सेवा रस्त्यावर सतत लहान, मोठे खड्डे पडलेले दिसून येतात. डांबर, खडी उखडलेल्या अवस्थेत असते, अशा गंभीर प्रकारामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे.


मोकाट जनावरांचा वावर वाढला असून तेही अपघातास कारणीभूत ठरत आहेत. नादुरुस्त वाहनांसाठी तत्काळ सुविधा मिळत नसल्याने ती वाहने तासनतास महामार्गावर उभी असतात. अशा वाहनांना धडकून अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. दौंड तालुक्यातील यवत, चौफुला, वरवंड, पाटस, कुरकुंभ, मळद, रावणगाव, खडकी, स्वामी चिंचोलीसह महामार्गावर इतर ठिकाणी असे अनेक ब्लॅक स्पॉट आहेत. तिथे तातडीने उपाययोजन करण्याची गरज आहे. यासंदर्भात कोणी काही बोलत नसल्याने या संबंधित प्रशासनाचा अधिकारी वर्ग, टोल विभाग सुस्त झाला आहे.


वारंवार भीषण अपघातात जखमी होतात, अपंगत्व येते, जीव गमवावा लागतो. पोलिस पंचनामा करून संबंधितांवर गुन्हे दाखल होतात. मात्र, अपघातांना आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. अपघातानंतर फरार झालेल्या वाहनांच्या तपासाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही.

Comments
Add Comment

पुणे महापालिकेचे मिशन मूषक विनाश! नाट्यगृह, प्रेक्षागृह आदी ठिकाणी पेस्ट कंट्राेल

महापालिकेच्या सर्वच नाट्यगृहांत ‘पेस्ट कंट्राेल’ पुणे: यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदराच्या उच्छादानंतर

99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान यावर्षी साताऱ्याला!

तब्बल ३२ वर्षानंतर भरवले जाणार चौथे संमेलन पुणे:  यंदाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan)

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.