Sunil Tatkare : सागरी महामार्गाचे काम चार ते पाच वर्षात होणार पूर्ण; खासदार सुनील तटकरे यांचा विश्वास

Share

अलिबाग : कोकणच्या विकासात महत्वपूर्ण ठरणा-या सागरी महामार्गावरील आठ पूलांच्या कामाकरिता निधी मंजूर झालेला आहे. त्यांची कामे आता वेगाने होतील. त्यात बरोबर महामार्गाच्या कामाल गती देण्यात येईल. परिणामी सागरी महामार्गाचे काम येत्या चार ते पाच वर्षात पूर्ण होईल, असा विश्वास रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर व माणगांव बायपासचे काम रखडले होते. तेथील भूमीसंपादनाची समस्या दुर झाली आहे. त्यामुळे या दोन्ही बायपासच्या कामांना आता वेग येईल. हे दोन्ही बायपास मार्ग सुरु झाल्यावर सध्या इंदापूर व माणगांव मधील वाहतूक कोंडीची समस्या पूर्णपणे संपेल व प्रवास वेगवान होईल. येथील सद्यस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन, हे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी पाठपूरावा करणार असल्याचेही खा. तटकरे यांनी सांगितले.

याच मार्गाला जोडून पुढे कोकणच्या ग्रीनफिल्ड सागरी महामार्गाची रचना करण्यात आली आहे. यामुळे किनारपट्टीचा प्रवास गतिमान होऊ शकणार आहे. हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी पाच मोठी सागरी पुले बांधावी लागणार आहेत. यामध्ये उरण-रेवस या सागरी पुलाचे काम सुरू झालेले आहे. दुसरे पूल आहे, आगरदांडा-दिवेआगर तर तिसरे पूल आहे हरिहरेश्वर-बाणकोट, चौथेपूल आहे दाभोळ-जयगड या सर्व पूलांना ग्रीनफिल्ड सागरी महामार्गाच्या नव्या रचनेत मंजूरी देण्यात आली आहे. मात्र हा महामार्ग होण्यास आणखी चार ते पाच वर्षे लागणार आहेत. किनारपट्टी सागरी महामार्गाची नवी रचना होत असताना दुस-या बाजुला आजच्या डिजिटल युगामध्ये नवतंत्रज्ञानाद्वारे सागरी किनारपट्टी विकास हाती घेण्यात आला आहे. देशातील १२ बंदरे आंतरराष्ट्रीय बंदरे म्हणून विकसीत होत आहेत, असेही ते म्हणाले.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

1 hour ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

3 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

3 hours ago