Gokhale Bridge : गोखले पुलाची तुळई खाली आणण्याचे काम अखेर पूर्ण

  105

कामाला उशीर झाल्यामुळे कंत्राटदाराला होणार दंड


मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलाची (Gokhale Bridge) दुसरी लोखंडी तुळई खाली आणण्याचे काम अखेरीस पूर्ण झाले आहे. तुळई खाली आणण्याचे काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ते खूपच लांबले. डिसेंबरमध्येही तुळई खाली आणल्यानंतर बेअरिंग हटवण्याचे काम २५ डिसेंबर रोजी पूर्ण झाले आहे. यानंतर आता पुढील कामे करण्यात येणार असून रेल्वे हद्दीतील काम पूर्ण करण्यास विलंब झाल्यामुळे कंत्राटदाराला दंड केला जाणार आहे. कंत्राटदाराला ३ कोटींपेक्षा अधिक दंड होण्याची शक्यता आहे.



अंधेरी पूर्व–पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाची एक बाजू २६ फेब्रुवारी रोजी सुरू झाल्यानंतर दुसरी बाजू कधी सुरू होणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. उड्डाणपुलाची दुसरी लोखंडी तुळई बसवून तीन महिने झाले तरी ही तुळई खाली आणण्याचे काम पूर्ण झाले नव्हते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही तुळई खाली आणली. मात्र या तुळईचे बेअरींग हटवून तुळई स्थापन करण्यास आणखी पंधरा दिवसांचा कालावधी लागला असून ही कामे आता अखेर २५ डिसेंबरला पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पुलाच्या दोन्ही तुळई आता समान पातळीवर आल्या आहेत. रेल्वे हद्दीतील काम पूर्ण करण्यासाठी १५ नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती. ही मुदत तब्बल दीड महिना पुढे गेली आहे. त्यामुळे कंत्राटदाराला दंड लावणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. नोव्हेंबर २०२२ पूलाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर १५ महिन्यांनी पुलाची एक बाजू सुरू होऊ शकली.



कंत्राटदाराला किमान तीन कोटीचा दंड


तुळई बसवण्यासाठी सुटे भाग आणण्याकरीता कंत्राटदाराने उशीर केल्याने कंत्राटदाराला पालिका प्रशासनाने नवीन वेळापत्रक दिले होते. मात्र ते वेळापत्रकही पाळणे कंत्राटदाराला जमलेले नाही. त्यामुळे पालिकेने आधीच १५ नोव्हेंबरपर्यंत रेल्वेच्या हद्दीतील कामे पूर्ण न झाल्यास ३ कोटीचा दंड आकारण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे ३ कोटींचा दंड कंत्राटदाराला लावण्यात येणार आहेत. त्यापुढे जितके दिवस उशीर झाला तितक्या दिवसांचा हिशोब करून त्याला दंड लावण्यात येईल अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही