Gokhale Bridge : गोखले पुलाची तुळई खाली आणण्याचे काम अखेर पूर्ण

  86

कामाला उशीर झाल्यामुळे कंत्राटदाराला होणार दंड


मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलाची (Gokhale Bridge) दुसरी लोखंडी तुळई खाली आणण्याचे काम अखेरीस पूर्ण झाले आहे. तुळई खाली आणण्याचे काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ते खूपच लांबले. डिसेंबरमध्येही तुळई खाली आणल्यानंतर बेअरिंग हटवण्याचे काम २५ डिसेंबर रोजी पूर्ण झाले आहे. यानंतर आता पुढील कामे करण्यात येणार असून रेल्वे हद्दीतील काम पूर्ण करण्यास विलंब झाल्यामुळे कंत्राटदाराला दंड केला जाणार आहे. कंत्राटदाराला ३ कोटींपेक्षा अधिक दंड होण्याची शक्यता आहे.



अंधेरी पूर्व–पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाची एक बाजू २६ फेब्रुवारी रोजी सुरू झाल्यानंतर दुसरी बाजू कधी सुरू होणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. उड्डाणपुलाची दुसरी लोखंडी तुळई बसवून तीन महिने झाले तरी ही तुळई खाली आणण्याचे काम पूर्ण झाले नव्हते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही तुळई खाली आणली. मात्र या तुळईचे बेअरींग हटवून तुळई स्थापन करण्यास आणखी पंधरा दिवसांचा कालावधी लागला असून ही कामे आता अखेर २५ डिसेंबरला पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पुलाच्या दोन्ही तुळई आता समान पातळीवर आल्या आहेत. रेल्वे हद्दीतील काम पूर्ण करण्यासाठी १५ नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती. ही मुदत तब्बल दीड महिना पुढे गेली आहे. त्यामुळे कंत्राटदाराला दंड लावणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. नोव्हेंबर २०२२ पूलाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर १५ महिन्यांनी पुलाची एक बाजू सुरू होऊ शकली.



कंत्राटदाराला किमान तीन कोटीचा दंड


तुळई बसवण्यासाठी सुटे भाग आणण्याकरीता कंत्राटदाराने उशीर केल्याने कंत्राटदाराला पालिका प्रशासनाने नवीन वेळापत्रक दिले होते. मात्र ते वेळापत्रकही पाळणे कंत्राटदाराला जमलेले नाही. त्यामुळे पालिकेने आधीच १५ नोव्हेंबरपर्यंत रेल्वेच्या हद्दीतील कामे पूर्ण न झाल्यास ३ कोटीचा दंड आकारण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे ३ कोटींचा दंड कंत्राटदाराला लावण्यात येणार आहेत. त्यापुढे जितके दिवस उशीर झाला तितक्या दिवसांचा हिशोब करून त्याला दंड लावण्यात येईल अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.