Chenab railway bridge : जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचे काम पूर्ण

काश्मीर ते कन्याकुमारी रेल्वे मार्ग सुरू होण्याची शक्यता


श्रीनगर : जगातील सर्वात उंच पूल अशी ओळख असणाऱ्या चिनाब पुलाचे (Chenab railway bridge) काम आता पूर्ण झाले आहे. रेल्वे मंत्रालयाने पत्रकारांचा दौरा या पुलाच्या ठिकाणी आयोजित केला होता.त्यावेळी ही‌ माहिती देण्यात आली आहे.आता या पुलाचे काम पूर्ण झाल्याने २६ जानेवारी रोजी काश्मीर ते कन्याकुमारी हा रेल्वे मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे.


''चिनाब नदीवरील रेल्वे पूल हा केवळ एक पूल नाही, तर भारताच्या तंत्रज्ञान, धैर्य, आणि दृढनिश्चयाचा हा पुरावा आहे. हा पूल स्थानिक जनतेसाठी जीवनरेखा ठरेल आणि जागतिक पातळीवर भारताचे नाव उंचावेल. यामुळे केवळ आर्थिक विकास नाही तर सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकात्मतेलाही प्रोत्साहन मिळेल,'' असे सरकारचे म्हणणे आहे.जम्मू काश्मीरमध्ये सद्या बनिहाल ते संगलदान या उत्तर भागात तर जम्मू ते कटरा अशी दक्षिणेकडे रेल्वे सुरू आहे. कटरा ते संगलदान या मधल्या‌ टप्प्यात रेल्वे सुरू करण्यासाठी चिनाब आणि अंजी हे दोन पूल पूर्ण होणे आवश्यक होते. आता ते पूर्ण झाल्याने २६ जानेवारी रोजी काश्मीर ते कन्याकुमारी हा रेल्वे मार्ग सुरू होऊ शकतो.



चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल हा भारताच्या जम्मू-कश्मीर प्रदेशातील उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा एक भाग आहे. हा पूल भारतीय रेल्वेने बांधला असून, त्याचे नाव 'चिनाब रेल्वे पूल' असे आहे. हा पूल ४६९ मीटर उंचीवर आहे, जो पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा सुमारे ३५ मीटर जास्त उंच आहे.चिनाब रेल्वे पुलाची उंची ३५९ मीटर (डेक ते नदी) आहे, तर त्याची एकूण लांबी १३१५ मीटर आहे. १७६ मीटरची मुख्य कमान पुलाचा प्रमुख भाग आहे. स्टील, काँक्रीट वापरून हा पूल बांधण्यात आला आहे.


अतिशय मजबूत आणि टिकाऊ बांधकाम असल्याने हा पुल भूकंप आणि वाऱ्याचा दाब सहन करू शकेल. या पुलावर विषम हवामान, स्फोट, आणि अन्य आपत्तीपासून संरक्षित करण्यासाठी आधुनिक सुरक्षा प्रणाली बसवण्यात आल्या आहेत. यामध्ये रेल्वे मार्गावर ऑटोमॅटिक सिग्नलिंग प्रणाली, जीपीएस ट्रॅकिंग, आणि इतर अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय