Weather Update : पुढील २ दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या धारा!

  110

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यभरात हाडं गोठवणाऱ्या थंडीनं नागरिक कुडकुडले होते. मात्र आता काही जिल्ह्यात हिवाळ्यात मुसळधार पावसाचे स्वरूप पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांसह शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.



कोणत्या भागात पावसाची शक्यता?


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच २७ डिसेंबर रोजी खान्देश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा आणि पच्छिम विभागातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.


दुसऱ्या दिवशी, २८ डिसेंबर, खान्देश, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भाग आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अतिरिक्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.



शेतकऱ्यांना पिकांचे काळजी घेण्याचे आवाहन


पावसाची शक्यता असणाऱ्या भागातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अपडेट्सकडे लक्ष द्यावे आणि त्यानुसार त्यांच्या शेती पद्धती समायोजित कराव्यात. हवामानातील या बदलांचे आकलन शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पिकांचे रक्षण करण्यासाठी आणि संभाव्य हानी कमी करण्यासाठी अत्यावश्यक आहे, असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.

Comments
Add Comment

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन