Weather Update : पुढील २ दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या धारा!

  142

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यभरात हाडं गोठवणाऱ्या थंडीनं नागरिक कुडकुडले होते. मात्र आता काही जिल्ह्यात हिवाळ्यात मुसळधार पावसाचे स्वरूप पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांसह शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.



कोणत्या भागात पावसाची शक्यता?


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच २७ डिसेंबर रोजी खान्देश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा आणि पच्छिम विभागातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.


दुसऱ्या दिवशी, २८ डिसेंबर, खान्देश, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भाग आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अतिरिक्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.



शेतकऱ्यांना पिकांचे काळजी घेण्याचे आवाहन


पावसाची शक्यता असणाऱ्या भागातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अपडेट्सकडे लक्ष द्यावे आणि त्यानुसार त्यांच्या शेती पद्धती समायोजित कराव्यात. हवामानातील या बदलांचे आकलन शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पिकांचे रक्षण करण्यासाठी आणि संभाव्य हानी कमी करण्यासाठी अत्यावश्यक आहे, असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.

Comments
Add Comment

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

मराठा आरक्षणासाठी समितीचे नवीन अध्यक्ष!

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालील 'महायुती' सरकारने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा समाजाच्या