Bhatinda Accident : पंजाबमध्ये प्रवासी बसचा भीषण अपघात, ८ ठार, अनेक जण जखमी

चंदीगड : पंजाबमधील भटिंडा येथे आज सकाळी एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत.एका खासगी कंपनीची बस नियंत्रण सुटून पुलावरुन थेट नाल्यात कोसळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.



मिळालेल्या माहितीनुसार, भटिंडा येथील कोटशमीर रोड येथे एक बस पुलावरून जात असताना नाल्यात कोसळली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी जखमी झाले. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात पाठवले.बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. अपघाताच्या वेळी पाऊस सुरु असावा, त्याचवेळी बसचा वेग जास्त होता, त्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. नेमका अपघात कसा झाला, हे अजून समजू शकलेलं नाही. बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. २४ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.





Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव