Bhatinda Accident : पंजाबमध्ये प्रवासी बसचा भीषण अपघात, ८ ठार, अनेक जण जखमी

  88

चंदीगड : पंजाबमधील भटिंडा येथे आज सकाळी एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत.एका खासगी कंपनीची बस नियंत्रण सुटून पुलावरुन थेट नाल्यात कोसळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.



मिळालेल्या माहितीनुसार, भटिंडा येथील कोटशमीर रोड येथे एक बस पुलावरून जात असताना नाल्यात कोसळली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी जखमी झाले. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात पाठवले.बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. अपघाताच्या वेळी पाऊस सुरु असावा, त्याचवेळी बसचा वेग जास्त होता, त्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. नेमका अपघात कसा झाला, हे अजून समजू शकलेलं नाही. बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. २४ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.





Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे