Suzuki चे माजी अध्यक्ष ओसामु सुझुकींचे निधन

Share

जपान : सुझुकी मोटार कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष ओसामु सुझुकी यांचे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. सुझुकी कंपनीच्या प्रसिद्धपत्रकानुसार लिम्फोमा या आजारामुळे ओसामु सुझुकी यांचे निधन झाले. ओसामु सुझुकी यांच्या कार्यकाळात सुझुकी कंपनीचा जगभर वेगाने विस्तार झाला. भारतातील मारुती या कंपनीसोबत सुझुकीने कार निर्मितीचा करार केला. भारतातील अनेकांचे स्वप्न मारुती सुझुकीच्या कारमुळे पूर्ण झाले. ओसामु सुझुकी यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.

ओसामु मात्सुदा यांचा जन्म ३० जानेवारी १९३० रोजी जपानमधील गेरो येथे झाला. त्यांनी १९५८ मध्ये सुझुकी कुटुंबातील मुलीशी विवाह केला. जावई म्हणून ओसामु मात्सुदा हे सुझुकी कंपनीशी जोडले गेले. ओसामु मात्सुदा हे बँक कर्मचारी होते तर त्यांची पत्नी शोको सुझुकी ही कार निर्मात्या मिचियो सुझुकी यांची नात होती. लग्नानंतर ओसामु मात्सुदा यांनी स्वतःच्या नावापुढे सुझुकी हे अडनाव जोडले. इथूनच ओसामु मात्सुदा यांच्या प्रगतीला सुरुवात झाली.

सुझुकी कंपनीची स्थापना मिचियो सुझुकी यांनी १९०९ मध्ये केली. पण या कंपनीत महत्त्वाची जबाबदारी मिळाल्यावर ओसामु मात्सुदा यांनी कंपनीचा विस्तार करण्यास सुरुवात केली. ओसामु मात्सुदा हे १९७८ पासून मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), प्रेसिडेंट, चेअरमन अशा वेगवेगळ्या पदांवर राहून २०२१ पर्यंत सुझुकी कंपनीची ध्येयधोरणे निश्चित करत होते. अखेर २०२१ मध्ये सुझुकी यांनी सल्लागार हे पद स्वीकारले आणि दैनंदिन कामापासून वेगळे झाले. सुझुकी कंपनीत चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ओसामु मात्सुदा यांच्या कार्यकाळात कंपनीचा अमेरिका आणि युरोपमध्येही विस्तार झाला. आज सुझुकी ही बहुराष्ट्रीय आणि बलाढ्य कार निर्माता कंपनी झाली आहे. छोट्या कारपासून एसयूव्ही पर्यंत अनेक प्रकारच्या कारची निर्मिती करणाऱ्या सुझुकी कंपनीने दुचाकींच्या क्षेत्रातही चांगली कामगिरी केली आहे.

बघा : खजूर खाण्याचे फायदे

भारतात इंदिरा गांधी पंतप्रधान असताना ओसामु मात्सुदा यांच्या सुझुकी कंपनीने मारुती कंपनीशी करार केला. हा करार १९८२ मध्ये झाला. यानंतर १९८३ मध्ये मारुती सुझुकी कंपनीची मारुती ८०० ही कार लाँच झाली. ही कार दीर्घ काळ भारतात प्रचंड लोकप्रिय होती.

Recent Posts

Viral News: ‘हे’ गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे; ६२ वर्षांनंतर बंदी हटवली!

मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…

1 hour ago

Mumbai Airport Close : प्रवासी कृपया लक्ष द्या, मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद राहणार आहे!

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…

1 hour ago

MI vs CSK, IPL 2025: मुंबई इंडियन्स मागील पराभवाचा वचपा काढणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…

2 hours ago

लिंबू लोणचं

पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…

2 hours ago

पुण्यात काँग्रेसला गळती, नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या वाटेवर

पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…

2 hours ago

भाषा हे राजकारण्यांच्या हातातले हत्यार नाही!

डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…

2 hours ago