Jioने दिला झटका, १९ आणि २९ रूपयांच्या प्लानमध्ये केले मोठे बदल

  81

मुंबई: जिओने(jio) आपल्या दोन प्लान्समध्ये बदल केले आहेत. दोन्हीही डेटा वाऊचर आहेत जे अतिरिक्त डेटासाठी युजर्सची पहिली पसंती असते. आम्ही बोलत आहोत जिओच्या १९ रूपये आणि २९ रूपयांच्या डेटा वाऊचरबद्दल.


या दोन्ही प्लान्समध्ये युजर्सला सध्याच्या प्लानपर्यंतची व्हॅलिडिटीसाठी डेटा मिळतो. येथे १९ रूपयांमध्ये कंपनी १ जीबी डेटा ऑफर करते. तर २९ रूपयांमध्ये कंपनी २ जीबी डेटा ऑफर करते. याची व्हॅलिडिटी बेस प्लान इतकीच असते.


जर तुमचा बेस प्लान ७० दिवसांचा आहे आणि तुम्ही पहिल्याच दिवशी १९ रूपयांचा रिचार्ज केला तर तुम्ही ७० दिवसांपर्यंत १ जीबी डेटा वापरता येतो. दरम्यान, कंपनीने या प्लान्सच्या व्हॅलिडिटीबमध्ये बदल केला आहे. आता या वाऊचर्ससोबत तुम्हाला बेस प्लान इतकी व्हॅलिडिटी मिळणार नाही.


१९ रूयांच्या डेटा वाऊचरसाठी १ दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी १ जीबी डेटा मिळेल. तुम्ही ज्या दिवशी रिचार्ज कराल तर त्या दिवसासाठी तुम्हाला डेटा मिळेल. तर २९ रूपयांच्या डेटा वाऊचरबद्दल बोलायचे झाल्यास यात ग्राहकांना २ दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी २ जीबी डेटा मिळेल.


नुकत्याच ट्रायने दिलेल्या एका आदेशात टेलिकॉम कंपन्यांनी व्हॉईस आणि एसएमएससाठी वेगवेगळे रिचार्ज करा असे म्हटले आहे. जिओ आणि एअरटेलने अशा रिचार्ज प्लान्सना विरोध करत होते. आता त्यांना या पद्धतीचे प्लान जारी करावे लागेल याची किंमत कमी होईल.

Comments
Add Comment

जेजे रुग्णालयाच्या पीआयसीयूमध्ये ३ मुलांचा मृत्यू: डॉक्टर आणि विभाग प्रमुखांमध्ये वाद?

मुंबई : जेजे रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग गेल्या २४ तासांत तीन मुलांच्या मृत्यूमुळे तीव्र तपासणीच्या

आरपीएफची मोठी कारवाई: दिव्यांगांच्या डब्यात घुसणाऱ्यांना दणका!

ठाणे : दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या लोकल ट्रेनच्या डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींवर

शर्ट फोटो कोड वापरून ड्रग्जची तस्करी: ४३४ कोटींच्या रॅकेटचा पर्दाफाश!

मुंबई : मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका ड्रग्ज टोळीने मेफेड्रोन (एमडी) नावाचे ड्रग म्हैसूरमधील उत्पादन

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना