Jioने दिला झटका, १९ आणि २९ रूपयांच्या प्लानमध्ये केले मोठे बदल

मुंबई: जिओने(jio) आपल्या दोन प्लान्समध्ये बदल केले आहेत. दोन्हीही डेटा वाऊचर आहेत जे अतिरिक्त डेटासाठी युजर्सची पहिली पसंती असते. आम्ही बोलत आहोत जिओच्या १९ रूपये आणि २९ रूपयांच्या डेटा वाऊचरबद्दल.


या दोन्ही प्लान्समध्ये युजर्सला सध्याच्या प्लानपर्यंतची व्हॅलिडिटीसाठी डेटा मिळतो. येथे १९ रूपयांमध्ये कंपनी १ जीबी डेटा ऑफर करते. तर २९ रूपयांमध्ये कंपनी २ जीबी डेटा ऑफर करते. याची व्हॅलिडिटी बेस प्लान इतकीच असते.


जर तुमचा बेस प्लान ७० दिवसांचा आहे आणि तुम्ही पहिल्याच दिवशी १९ रूपयांचा रिचार्ज केला तर तुम्ही ७० दिवसांपर्यंत १ जीबी डेटा वापरता येतो. दरम्यान, कंपनीने या प्लान्सच्या व्हॅलिडिटीबमध्ये बदल केला आहे. आता या वाऊचर्ससोबत तुम्हाला बेस प्लान इतकी व्हॅलिडिटी मिळणार नाही.


१९ रूयांच्या डेटा वाऊचरसाठी १ दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी १ जीबी डेटा मिळेल. तुम्ही ज्या दिवशी रिचार्ज कराल तर त्या दिवसासाठी तुम्हाला डेटा मिळेल. तर २९ रूपयांच्या डेटा वाऊचरबद्दल बोलायचे झाल्यास यात ग्राहकांना २ दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी २ जीबी डेटा मिळेल.


नुकत्याच ट्रायने दिलेल्या एका आदेशात टेलिकॉम कंपन्यांनी व्हॉईस आणि एसएमएससाठी वेगवेगळे रिचार्ज करा असे म्हटले आहे. जिओ आणि एअरटेलने अशा रिचार्ज प्लान्सना विरोध करत होते. आता त्यांना या पद्धतीचे प्लान जारी करावे लागेल याची किंमत कमी होईल.

Comments
Add Comment

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने