Jioने दिला झटका, १९ आणि २९ रूपयांच्या प्लानमध्ये केले मोठे बदल

मुंबई: जिओने(jio) आपल्या दोन प्लान्समध्ये बदल केले आहेत. दोन्हीही डेटा वाऊचर आहेत जे अतिरिक्त डेटासाठी युजर्सची पहिली पसंती असते. आम्ही बोलत आहोत जिओच्या १९ रूपये आणि २९ रूपयांच्या डेटा वाऊचरबद्दल.


या दोन्ही प्लान्समध्ये युजर्सला सध्याच्या प्लानपर्यंतची व्हॅलिडिटीसाठी डेटा मिळतो. येथे १९ रूपयांमध्ये कंपनी १ जीबी डेटा ऑफर करते. तर २९ रूपयांमध्ये कंपनी २ जीबी डेटा ऑफर करते. याची व्हॅलिडिटी बेस प्लान इतकीच असते.


जर तुमचा बेस प्लान ७० दिवसांचा आहे आणि तुम्ही पहिल्याच दिवशी १९ रूपयांचा रिचार्ज केला तर तुम्ही ७० दिवसांपर्यंत १ जीबी डेटा वापरता येतो. दरम्यान, कंपनीने या प्लान्सच्या व्हॅलिडिटीबमध्ये बदल केला आहे. आता या वाऊचर्ससोबत तुम्हाला बेस प्लान इतकी व्हॅलिडिटी मिळणार नाही.


१९ रूयांच्या डेटा वाऊचरसाठी १ दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी १ जीबी डेटा मिळेल. तुम्ही ज्या दिवशी रिचार्ज कराल तर त्या दिवसासाठी तुम्हाला डेटा मिळेल. तर २९ रूपयांच्या डेटा वाऊचरबद्दल बोलायचे झाल्यास यात ग्राहकांना २ दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी २ जीबी डेटा मिळेल.


नुकत्याच ट्रायने दिलेल्या एका आदेशात टेलिकॉम कंपन्यांनी व्हॉईस आणि एसएमएससाठी वेगवेगळे रिचार्ज करा असे म्हटले आहे. जिओ आणि एअरटेलने अशा रिचार्ज प्लान्सना विरोध करत होते. आता त्यांना या पद्धतीचे प्लान जारी करावे लागेल याची किंमत कमी होईल.

Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील