Health Tips: थंडीच्या दिवसांत दररोज किती अंडी खावीत?

मुंबई: संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असे म्हटले जाते. अंड्याचे आरोग्यासाठी(Health)अनेक फायदे होतात. अंड्यामध्ये प्रोटीनसह अनेक महत्त्वाचे घटक असतात जे आपल्या निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. अंडी खाल्ल्याने आपल्या शरीरास इन्स्टंट एनर्जी मिळते.

थंडीच्या दिवसांत अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. या दिवसांत शरीलाला उष्णता देणाऱ्या पदार्थांची गरज असते. त्यामुळे या मोसमात अंडीही मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. मात्र अंडी खाण्याचेही काही प्रमाण असते. थंडीच्या दिवसांत शरीर उबदार राखणयासाठी दररोज अंडी खाणे फायदेशीर ठरते.

अंड्यांमध्ये प्रोटीन, व्हिटामिन आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असल्याने शरीराला गरम राखण्यात मदत होते. आज जाणून घेऊया थंडीत दररोज किती अंडी खाल्ली पाहिजे. तज्ञांनुसार थंडीच्या दिवसांत दररोज १ अथवा २ अंडी खाणे फायदेशीर ठरते.



व्हिटामिन डीने परिपूर्ण असलेली अंडी हाडांसाठीही अतिशय परिपूर्ण आहेत. मेंदूच्या पेशींचे कार्यही सुरळीत राहते. याशिवाय हार्मोनल फंक्शनला बॅलन्स करण्यासाठीही फायदेशीर ठरतात.

अंड्यामध्ये हाय प्रोटीन आणि ओमेगा ३ सारखे खास गुण असतात जे प्रतिकारशक्ती वाढवण्यासोबत शरीराची शक्तीही वाढवतात. थंडीच्या दिवसांत केस गळण्याची समस्याही वाढते. अशातच अंड्याचे सेवन केल्याने ही समस्या कमी होण्यास मदत होते.

 
Comments
Add Comment

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे