Protest : याला म्हणतात दणका! संतप्त विद्यार्थ्यांपुढे एसटी व्यवस्थापन नरमले!

अमरावती : दर्यापूर दहीहंडामार्गे धावणाऱ्या एसटी बसेस दररोज उशिरा धावतात. यामुळे दर्यापूर येथे शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतो. दहीहंडामार्गे दररोज सायंकाळी ५.३० च्या एसटी बसच्या फेरीने चक्क विद्यार्थ्यांसह प्रवाशांना हुलकावणी देत परस्पर निघून गेल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी दर्यापूर बसस्थानकातून निघणाऱ्या सर्व बसेस रोखून (Protest) धरल्या.


दहिहांडा मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेस दुपारी १.३० वाजतापासून रस्त्यावर निघाल्याच नाही. शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी पाच वाजल्यापासून बस स्टॉपवर बसच्या प्रतीक्षेत होते. ५.३० वाजता दहीहंडामार्गे धावणारी एसटी बससुद्धा निघाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फोन करुन डेपोतील रेकॉर्डवर चौकशी केली असता, ती गाडी अंजनगावमार्गे परस्पर निघून गेल्याचे आढळले. यामुळे संतापलेल्या जे. डी. पाटील महाविद्यालय व आदर्श हायस्कूल तसेच रत्नाबाई शाळेमधील विद्यार्थी तसेच दहीहंडामार्गे जाणारे विद्यार्थ्यांनी या त्रासाला कंटाळून थेट मिळेल त्या वाहनाने दर्यापूर एसटी बस स्थानक गाठले आणि तीव्र आंदोलन करत सायंकाळी ७ वाजल्यापासून दर्यापूर एसटी बस स्थानकातून निघणाऱ्या सर्व गाड्या रोखल्या. विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन करीत एकही बस स्थानकाबाहेर निघू दिली नाही.



बसस्थानक व्यवस्थापकांना विचारणा केली असता त्यांनी गाडी सोडण्यात चुक झाल्याचे सांगितले. दरम्यान दर्यापूरचे ठाणेदार सुनील वानखडे तसेच सुनील साबळे, सिद्धू आठवले यांनी मध्यस्थी करत विद्यार्थी व विद्यार्थ्यांना दहीहंडामार्गे जाणाऱ्या सर्व प्रवाशांना विनंती केली. आजच्या दिवस जी बस मिळेल, त्या बसने जावे, उद्यापासून सर्व नियोजन विद्यार्थ्यांच्या म्हणण्याप्रमाणे होईल, अशी शास्वती देत आंदोलनाची सांगता केली. त्यानंतर विद्यार्थी व प्रवासी दहीहंडामार्गे निघून गेले.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास