Protest : याला म्हणतात दणका! संतप्त विद्यार्थ्यांपुढे एसटी व्यवस्थापन नरमले!

अमरावती : दर्यापूर दहीहंडामार्गे धावणाऱ्या एसटी बसेस दररोज उशिरा धावतात. यामुळे दर्यापूर येथे शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतो. दहीहंडामार्गे दररोज सायंकाळी ५.३० च्या एसटी बसच्या फेरीने चक्क विद्यार्थ्यांसह प्रवाशांना हुलकावणी देत परस्पर निघून गेल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी दर्यापूर बसस्थानकातून निघणाऱ्या सर्व बसेस रोखून (Protest) धरल्या.


दहिहांडा मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेस दुपारी १.३० वाजतापासून रस्त्यावर निघाल्याच नाही. शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी पाच वाजल्यापासून बस स्टॉपवर बसच्या प्रतीक्षेत होते. ५.३० वाजता दहीहंडामार्गे धावणारी एसटी बससुद्धा निघाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फोन करुन डेपोतील रेकॉर्डवर चौकशी केली असता, ती गाडी अंजनगावमार्गे परस्पर निघून गेल्याचे आढळले. यामुळे संतापलेल्या जे. डी. पाटील महाविद्यालय व आदर्श हायस्कूल तसेच रत्नाबाई शाळेमधील विद्यार्थी तसेच दहीहंडामार्गे जाणारे विद्यार्थ्यांनी या त्रासाला कंटाळून थेट मिळेल त्या वाहनाने दर्यापूर एसटी बस स्थानक गाठले आणि तीव्र आंदोलन करत सायंकाळी ७ वाजल्यापासून दर्यापूर एसटी बस स्थानकातून निघणाऱ्या सर्व गाड्या रोखल्या. विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन करीत एकही बस स्थानकाबाहेर निघू दिली नाही.



बसस्थानक व्यवस्थापकांना विचारणा केली असता त्यांनी गाडी सोडण्यात चुक झाल्याचे सांगितले. दरम्यान दर्यापूरचे ठाणेदार सुनील वानखडे तसेच सुनील साबळे, सिद्धू आठवले यांनी मध्यस्थी करत विद्यार्थी व विद्यार्थ्यांना दहीहंडामार्गे जाणाऱ्या सर्व प्रवाशांना विनंती केली. आजच्या दिवस जी बस मिळेल, त्या बसने जावे, उद्यापासून सर्व नियोजन विद्यार्थ्यांच्या म्हणण्याप्रमाणे होईल, अशी शास्वती देत आंदोलनाची सांगता केली. त्यानंतर विद्यार्थी व प्रवासी दहीहंडामार्गे निघून गेले.

Comments
Add Comment

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये