Protest : याला म्हणतात दणका! संतप्त विद्यार्थ्यांपुढे एसटी व्यवस्थापन नरमले!

अमरावती : दर्यापूर दहीहंडामार्गे धावणाऱ्या एसटी बसेस दररोज उशिरा धावतात. यामुळे दर्यापूर येथे शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतो. दहीहंडामार्गे दररोज सायंकाळी ५.३० च्या एसटी बसच्या फेरीने चक्क विद्यार्थ्यांसह प्रवाशांना हुलकावणी देत परस्पर निघून गेल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी दर्यापूर बसस्थानकातून निघणाऱ्या सर्व बसेस रोखून (Protest) धरल्या.


दहिहांडा मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेस दुपारी १.३० वाजतापासून रस्त्यावर निघाल्याच नाही. शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी पाच वाजल्यापासून बस स्टॉपवर बसच्या प्रतीक्षेत होते. ५.३० वाजता दहीहंडामार्गे धावणारी एसटी बससुद्धा निघाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फोन करुन डेपोतील रेकॉर्डवर चौकशी केली असता, ती गाडी अंजनगावमार्गे परस्पर निघून गेल्याचे आढळले. यामुळे संतापलेल्या जे. डी. पाटील महाविद्यालय व आदर्श हायस्कूल तसेच रत्नाबाई शाळेमधील विद्यार्थी तसेच दहीहंडामार्गे जाणारे विद्यार्थ्यांनी या त्रासाला कंटाळून थेट मिळेल त्या वाहनाने दर्यापूर एसटी बस स्थानक गाठले आणि तीव्र आंदोलन करत सायंकाळी ७ वाजल्यापासून दर्यापूर एसटी बस स्थानकातून निघणाऱ्या सर्व गाड्या रोखल्या. विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन करीत एकही बस स्थानकाबाहेर निघू दिली नाही.



बसस्थानक व्यवस्थापकांना विचारणा केली असता त्यांनी गाडी सोडण्यात चुक झाल्याचे सांगितले. दरम्यान दर्यापूरचे ठाणेदार सुनील वानखडे तसेच सुनील साबळे, सिद्धू आठवले यांनी मध्यस्थी करत विद्यार्थी व विद्यार्थ्यांना दहीहंडामार्गे जाणाऱ्या सर्व प्रवाशांना विनंती केली. आजच्या दिवस जी बस मिळेल, त्या बसने जावे, उद्यापासून सर्व नियोजन विद्यार्थ्यांच्या म्हणण्याप्रमाणे होईल, अशी शास्वती देत आंदोलनाची सांगता केली. त्यानंतर विद्यार्थी व प्रवासी दहीहंडामार्गे निघून गेले.

Comments
Add Comment

कोकणासाठी सोनेरी दिवस; महाराष्ट्र सरकार उभारणार वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग

मंत्री नितेश राणेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण

Game Changer Decision.... वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाला हिरवा कंदील, कोकणच्या विकासाची दारं उघडणार!'

आंबा, काजू, मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार; तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध होईल – मंत्री नितेश राणे नागपूर:

Breaking News ! पालिका निवडणुकीसाठी युतीचा फॉर्म्युला ठरणार? भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज रात्री ९ वाजता महत्त्वपूर्ण बैठक

नागपूर : राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या

मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी आता लोकायुक्तांच्या चौकशीकक्षेत

महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक २०२५ विधानसभेत मंजूर नागपूर : महाराष्ट्रातील भ्रष्टाचार विरोधी यंत्रणेला

पुणे आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनींना वारंवार करावी लागते 'प्रेग्नन्सी टेस्ट'; आमदारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न

नागपूर : पुणे जिल्ह्यातील आदिवासी शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थिनींना सुट्टीवरून परतल्यानंतर वारंवार

मुंबईकरांसाठी मोठी भेट, ओसी नसलेल्या २० हजार इमारतींना मिळणार दिलासा

दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना फायदा सुधारीत भोगवटा अभय योजनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून