Ind vs Aus : बॉक्सिंग डे कसोटीत विराट कोहली भडकला, सॅम कॉन्स्टासशी रंगला वाद, Video

मेलबर्न: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना आजपासून मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा नवोदित क्रिकेटर सॅम कॉन्स्टास यांच्यात शा‍ब्दिक वाद रंगला.


१९ वर्षीय गोलंदाजाने पहिल्याच सामन्यात अर्धशतक ठोकत आपल्या कसोटी करिअरची सुरूवात शानदार केली. त्याने काही आक्रमक शॉट खेळत भारतीय गोलंदाजांना त्रस्त केले. यामुळे ऑस्ट्रेलियाला सुरूवातीला आघाडी घेम्यास मदत मिळाली. मोहम्मद सिराजने १०व्या षटकात गोलंदाजी केल्यानंतर विराट कोहलीने सॅम कॉन्स्टासवर शा‍ब्दिक हल्ला केला. दोघांमध्ये बाचाबाचीही झाली. यावेळेस उस्मान ख्वाजा, जडेजा आणि अंपायर यांनी मध्यस्थी करत प्रकरण सोडवले.



येथे पाहा विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टास यांच्यातील वाद


 


मालिका १-१ अशा बरोबरीत


ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडिया आणि यजमान संघ यांच्यात ५ सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका खेळवली जात आहे. यामध्ये पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्या भारत संघाने विजयी सुरूवात केली होती. त्यानंतर अॅडलेड येथील दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने बाजी मारत सामना जिंकला. तिसरा सामना दोन्ही संघादरम्यान अनिर्णीत राहिला. तीन सामन्यानंतर या कसोटी मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहेत.

Comments
Add Comment

'शार्दुल ठाकूर' मुंबई रणजी संघाचा नवा कर्णधार; अजिंक्य रहाणेनंतर मिळाली सूत्रे!

मुंबई: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याची आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाने

रहस्यमय 'TEN x YOU' चा पडदा उघडला! सचिन तेंडुलकरने लाँच केला खेळाडूंच्या अनुभवातून जन्माला आलेला ब्रँड

२५ वर्षांचा अनुभव, भारतीय शरीरयष्टीनुसार खास डिझाईन; 'गल्ली ते स्टेडियम' प्रत्येक खेळाडूसाठी नवी क्रांती मुंबई:

IND vs WI: पहिला दिवस यशस्वीच्या नावावर, टीम इंडिया मजबूत स्थितीत

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ

रवींद्र जडेजा आपला ‘गुरू’ - कुलदीप यादव

अहमदाबाद : भारतीय संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी संघातील अनुभवी गोलंदाज

भारताला वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका २-0 ने जिंकण्याची संधी

नवी दिल्ली : पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाने डावाने विजय मिळवला होता. आता टीम इंडिया आता

IND vs SA: वर्ल्डकपमध्ये द. आफ्रिकेने रोखला भारताचा विजयरथ, मिळवला ३ विकेटनी विजय

विशाखापट्टणम: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५मध्ये द. आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाचा विजयरथ रोखला आहे.