Akkalkot Swami Samarth Temple : अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिर परिसरात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू

सोलापूर : अक्कलकोटनिवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात तीर्थक्षेत्र विकासकामांसाठी रखडलेले भूसंपादन अखेर अक्कलकोट नगरपालिकेने हाती घेतले आहे. यात ११०६२ चौरस मीटर जमीन संपादित करण्यासाठी नगरपालिकेने प्रसिद्धीकरण केले आहे.


एकीकडे राज्य शासनाने अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासकामांच्या आराखड्यास मंजुरी दिली असताना दुसरीकडे गेल्या ४० हून अधिक वर्षांपासून रखडलेले भूसंपादन करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आल्यामुळे आगामी काळात श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचा गुदमरलेला श्वास मोकळा होणार आहे.



अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रमाकांत डाके यांनी दिलेल्या माहितीनुसार श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील जागा १९७८ साली शासनाने विकासासाठी आरक्षित केली होती. त्याप्रमाणे ही जागा संपादन करण्याची जबाबदारी श्री स्वामी समर्थ मंदिर समितीवर निश्चित करण्यात आली होती. त्यासंबंधी मंदिर समितीची नगरपालिका प्रशासनाने वेळोवेळी पत्रव्यवहारही केला होता. परंतु भूसंपादन रखडले होते. आवश्यक कालावधी टळल्यानंतरही भूसंपादन न झाल्यामुळे मूळ जागामालकांनी जागा खरेदी करण्यासाठी न्यायालयात धाव घेऊन नोटीस बजावली होती. कायदेशीर नियमानुसार आरक्षण निश्चित झाल्यानंतर पुढे एक वर्षाच्या मुदतीत जागा संपादित करणे आवश्यक आहे. अन्यथा आरक्षण रद्द होऊ शकते. त्यामुळे अक्कलकोट शहराचे मोठे नुकसान होऊ शकते. त्याचा विचार करूनच नगरपालिकेने जागा संपादनासाठी प्रक्रिया हाती घेतली आहे.

Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या