Crime News : सहा लग्न करून आणि सासरच्यांना लुबाडून पळालेल्या तरुणीला सातव्या लग्नाआधी अटक

  66

नवी दिल्ली : अविवाहीत असलेल्या पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे नंतर लग्न करायचे. लग्नानंतर संधी साधून सासरच्यांना लुबाडून फरार व्हायचे, या पद्धतीने एका मागून एक तब्बल सहा विवाह केलेल्या तरुणीने सातव्या विवाहाची तयारी सुरू केली होती. या विवाहाआधीच पोलिसांनी तरुणीला अटक केली.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या तरुणीचे नाव पूनम असे आहे. पूनम अविवाहीत असलेल्या पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत लग्न करत होती. या कटात पूनमसोबत संजना गुप्ता आई म्हणून सहभागी होत होती. विमलेश वर्मा आणि धर्मेंद्र प्रजापती हे दोघे अविवाहीत पुरुषांची माहिती मिळवून ती पूनम आणि संजना यांना पुरवत होते. या माहितीआधारे कट रचून पूनम अविवाहीत असलेल्या पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत होती. या प्रकरणात पूनम, संजना गुप्ता, विमलेश वर्मा आणि धर्मेंद्र प्रजापती या चौघांना अटक करण्यात आली आहे.


अविवाहीत असलेल्या आणि लग्न करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांची माहिती मिळवायची. लग्नेच्छुक असलेल्यांपैकी एखाद्या तरुणाला ठरवून जाळ्यात ओढायचे. हळू हळू तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याचा विश्वास संपादन करायचा. लग्न केल्यानंतर संधी साधून घरातील पैसा आणि सोन्याचांदीचे दागिने घेऊन पळ काढायचा, असा प्रकार सुरू होता.


पूनम आणि तिचे सहकारी यांचा कारभार बिनबोभाट सुरू होता. पण सातवे सावज अपेक्षेप्रमाणे जाळ्यात अडकले नाही. उपाध्याय नावाच्या तरुणाला पूनमने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नासाठी उपाध्यायने किमान दीड लाखांचा खर्च करावा यासाठी पूनमचे सहकारी प्रयत्न करत होते. पण संशय आल्यामुळे आयत्यावेळी उपाध्यायने पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि सगळा प्रकार उघड झाला.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )