Crime News : सहा लग्न करून आणि सासरच्यांना लुबाडून पळालेल्या तरुणीला सातव्या लग्नाआधी अटक

नवी दिल्ली : अविवाहीत असलेल्या पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे नंतर लग्न करायचे. लग्नानंतर संधी साधून सासरच्यांना लुबाडून फरार व्हायचे, या पद्धतीने एका मागून एक तब्बल सहा विवाह केलेल्या तरुणीने सातव्या विवाहाची तयारी सुरू केली होती. या विवाहाआधीच पोलिसांनी तरुणीला अटक केली.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या तरुणीचे नाव पूनम असे आहे. पूनम अविवाहीत असलेल्या पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत लग्न करत होती. या कटात पूनमसोबत संजना गुप्ता आई म्हणून सहभागी होत होती. विमलेश वर्मा आणि धर्मेंद्र प्रजापती हे दोघे अविवाहीत पुरुषांची माहिती मिळवून ती पूनम आणि संजना यांना पुरवत होते. या माहितीआधारे कट रचून पूनम अविवाहीत असलेल्या पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत होती. या प्रकरणात पूनम, संजना गुप्ता, विमलेश वर्मा आणि धर्मेंद्र प्रजापती या चौघांना अटक करण्यात आली आहे.


अविवाहीत असलेल्या आणि लग्न करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांची माहिती मिळवायची. लग्नेच्छुक असलेल्यांपैकी एखाद्या तरुणाला ठरवून जाळ्यात ओढायचे. हळू हळू तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याचा विश्वास संपादन करायचा. लग्न केल्यानंतर संधी साधून घरातील पैसा आणि सोन्याचांदीचे दागिने घेऊन पळ काढायचा, असा प्रकार सुरू होता.


पूनम आणि तिचे सहकारी यांचा कारभार बिनबोभाट सुरू होता. पण सातवे सावज अपेक्षेप्रमाणे जाळ्यात अडकले नाही. उपाध्याय नावाच्या तरुणाला पूनमने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नासाठी उपाध्यायने किमान दीड लाखांचा खर्च करावा यासाठी पूनमचे सहकारी प्रयत्न करत होते. पण संशय आल्यामुळे आयत्यावेळी उपाध्यायने पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि सगळा प्रकार उघड झाला.

Comments
Add Comment

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने

गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण,

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'