Mumbai: मुंबईत पाण्याची टाकी फुटली, ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई: मुंबईच्या नागपाडा परिसरात पाण्याची टाकी फुटल्याने झालेल्या अपघातात एका ९ वर्षीय मुलीचा मृत्यू(child death) झाला आहे. तर इतर ३ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात सर्वांनाच धक्का बसला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या सिद्धार्थनगरमध्ये बीएमसी कॉलनीचे काम सुरू होते. येथे काम करणारे मजूर आपल्यासाठी पाण्याची टाकी बनवत होते. ही टाकी सिमेंटने बनवली होती. बुधवारी सकाळी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाली. यामुळे टाकीतील पाण्याचा प्रेशर वाढला आणि टाकी फुटली.


टाकीजवळ एक ९ वर्षांची मुलगी खुशी शहा खेळत होती तर तीन जण बसले होते. या दुर्घटनेत खुशीचा जागीच मृत्यू झाला.तर इतर तीन जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी फौजिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


या दुर्घटनेत १० वर्षीय मिनाज शहा, ३२ वर्षीय गुलाम मुल्ला आणि ३५ वर्षीय नजराना अली हुसैन हे तिघे जखमी झाले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक; मंत्री आदिती तटकरे

मुंबई :  रस्त्यावर राहणाऱ्या, अनाथ, एकल आणि दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ पथदर्शी योजना सहा

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

टेक-महाइम्पॅक्ट परिषदेत पहिल्याच दिवशी १५० कोटींचे करार

मुंबई : राज्याच्या तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकासाला मोठी गती देण्यासाठी ‘आयटी’ विभागाच्या वतीने बुधवारी

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत; कृषि मंत्री दत्तात्रय भरणे

द्राक्ष पिकाचा समावेश करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी