Mumbai: मुंबईत पाण्याची टाकी फुटली, ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

  64

मुंबई: मुंबईच्या नागपाडा परिसरात पाण्याची टाकी फुटल्याने झालेल्या अपघातात एका ९ वर्षीय मुलीचा मृत्यू(child death) झाला आहे. तर इतर ३ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात सर्वांनाच धक्का बसला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या सिद्धार्थनगरमध्ये बीएमसी कॉलनीचे काम सुरू होते. येथे काम करणारे मजूर आपल्यासाठी पाण्याची टाकी बनवत होते. ही टाकी सिमेंटने बनवली होती. बुधवारी सकाळी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाली. यामुळे टाकीतील पाण्याचा प्रेशर वाढला आणि टाकी फुटली.


टाकीजवळ एक ९ वर्षांची मुलगी खुशी शहा खेळत होती तर तीन जण बसले होते. या दुर्घटनेत खुशीचा जागीच मृत्यू झाला.तर इतर तीन जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी फौजिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


या दुर्घटनेत १० वर्षीय मिनाज शहा, ३२ वर्षीय गुलाम मुल्ला आणि ३५ वर्षीय नजराना अली हुसैन हे तिघे जखमी झाले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Health: दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी ५ महत्त्वाच्या सवयी

मुंबई : प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्यासह निरोगी आयुष्य जगण्याची इच्छा असते. पण हे फक्त इच्छा असून साध्य होत

गणेशोत्सवाच्या सुट्टीत खुले राहणार 'जिजामाता उद्यान'

मुंबई: गणेशोत्सवाच्या सुट्टीतही 'जिजामाता उद्यान' बुधवारी पर्यटकांसाठी खुले राहणार आहे. मात्र २८ ऑगस्ट या दिवशी

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

वास्तुुशास्त्रानुसार, 'या' तीन गोष्टी घरात ठेवल्यास घरात सुख-समृद्धी नांदेल आणि होईल आर्थिक भरभराट

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, घरात काही विशिष्ट

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत

Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद मोहीम, चोरीला गेलेले ८,००० मोबाईल परत मिळवून दिले

मुंबई: मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली