Mumbai: मुंबईत पाण्याची टाकी फुटली, ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई: मुंबईच्या नागपाडा परिसरात पाण्याची टाकी फुटल्याने झालेल्या अपघातात एका ९ वर्षीय मुलीचा मृत्यू(child death) झाला आहे. तर इतर ३ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात सर्वांनाच धक्का बसला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या सिद्धार्थनगरमध्ये बीएमसी कॉलनीचे काम सुरू होते. येथे काम करणारे मजूर आपल्यासाठी पाण्याची टाकी बनवत होते. ही टाकी सिमेंटने बनवली होती. बुधवारी सकाळी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाली. यामुळे टाकीतील पाण्याचा प्रेशर वाढला आणि टाकी फुटली.


टाकीजवळ एक ९ वर्षांची मुलगी खुशी शहा खेळत होती तर तीन जण बसले होते. या दुर्घटनेत खुशीचा जागीच मृत्यू झाला.तर इतर तीन जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी फौजिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


या दुर्घटनेत १० वर्षीय मिनाज शहा, ३२ वर्षीय गुलाम मुल्ला आणि ३५ वर्षीय नजराना अली हुसैन हे तिघे जखमी झाले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Nanded Railway : महाराष्ट्रातून उत्तर भारतीयांसाठी रेल्वेगाड्या उपलब्ध, पण नांदेड एक्स्प्रेसचा मुहूर्त कधी लागणार ?

मुंबई : मुंबईतून उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवनवीन गाड्या उपलब्ध होत आहेत. मात्र,

Akshay Kumar Injured : 'भूत बंगला'च्या शूटिंगदरम्यान अभिनेता अक्षय कुमारला दुखापत, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारला त्याच्या आगामी 'भूत बंगला'(Bhooth Bangla) या हॉरर-कॉमेडी सिनेमाच्या

Big Boss Marathi 6 : 'तिच्या भावना खोट्या वाटतात', राखी सांवतबद्दल सागर कारंडे म्हणाला...

मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ यंदा चांगलाच गाजला असून आता बिग बॉस मराठीचे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. नुकताच

Marathi Entertainment : कॉमेडीचा ओव्हरडोस देणाऱ्या 'पिक्चर बॉईज'चा धमाकेदार टीझर लाँच

मुंबई : उन्हाळ्याच्या सुटीत कॉमेडीचा सुखद अनुभव देणाऱ्या पिक्चर बॉईज या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. १५

Homemade Body Scrub : उन्हाळ्यात 'हे' घरगुती स्क्रब ठरतील फायदेशीर, त्वचा होईल चमदार

उन्हाळ्यात तीव्र ऊन, आर्द्रतेमुळे चेहरा काळवंडतो. कडक उन्हामध्येही चेहरा फ्रेश राहावा, चेहऱ्यावरची चमक कायम

Jalna Murder Case : आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी ठरवलेला दिवसच ठरला अंतिम, पोटच्या मुलानेच केली निघृण हत्या

जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यात एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या