Tuljabhavani Temple : आता २२ तास खुले राहणार तुळजाभवानीचं दर्शन!

  95

तुळजापूर : नाताळच्या सुट्ट्या नवीन वर्ष तसेच लग्नसराईमुळे तुळजाभवानी मंदिरात भाविकांच्या गर्दीच प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आजपासून पुढील ८ दिवस म्हणजेच एक डिसेंबर पर्यंत मंदिर २२ तास खुले ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. २५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत मंदिर पहाटे १ वाजता चरणतीर्थ पूजा होऊन भविकासाठी खुले करण्यात येणार, तर रात्री साडेदहाच्या सुमारास प्रक्षाळ पूजेनंतर मंदिर बंद करण्यात येणार आहे. मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार माया माने यांनी तसे आदेश काढलेत.


नाताळ, नवीन वर्ष, आणि लग्नसराईमुळे मोठ्या प्रमाणावर लोक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येतात. राज्यासह परराज्यातूनही तुळजाभवानीच्या चरणी आशिर्वाद घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यसाठी भाविकांची गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मंदिर परिसरात सध्या भक्तांची विशेष गर्दी होत आहे.




प्रशासनाचा अधिकृत आदेश


मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार माया माने यांनी हा निर्णय घेतल्याचे अधिकृत आदेश काढले आहेत. गर्दीचे नियोजन आणि भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज आहे. भाविकांना सुव्यवस्थित दर्शनाची सुविधा देण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी, स्वयंसेवक, आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.



नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी


२५ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ या कालावधीत मंदिर २२ तास खुले ठेवण्यात येणार आहे. पहाटे १ वाजता चरणतीर्थ पूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येईल, तर रात्री १०.३० वाजता प्रक्षाळ पूजा होऊन मंदिर बंद केले जाईल. या काळात भाविकांना देवीचे दर्शन अधिक सुलभपणे घेता यावे यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.



तुळजापूर भाविकांनी गजबजले


महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. एकीकडे नाताळ सण तर दुसरीकडे लग्नसराईमुळे राज्यासह तेलंगना, कर्नाटकसह राज्यभरातुन भाविक आईच्या दर्शनास येत आहे. तुळजाभवानी मातेचा कुलधर्म कुलाचार जागर गोंधळ, अभिषेक पुजा करण्यासाठी भाविक येत असतात त्यामुळे तुळजाई नगरी भाविकांनी गजबजून गेली आहे. मंदिर परिसर आणि तुळजाई नगरी भाविकांनी गजबजलेली आहे. धार्मिक विधींसोबतच सणासुदीचा उत्साहही वातावरणात जाणवत आहे. कुलधर्म, कुलाचार जागर, गोंधळ, अभिषेक पूजा करण्यासाठी भाविक मंदिरात येत आहेत. देवीच्या दर्शनासाठी तासन्तास रांगा लावल्या आहेत.


Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित