Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0 : बळीराजासाठी नववर्षाची भेट! सरकारने सुरु केली 'ही' गेम चेंजर योजना

मुंबई : महाराष्ट्र सरकारकडून (State Government) शेतकरी, महिला, शालेय विद्यार्थी तसेच तरुण विद्यार्थ्यांसाठीही अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत. तसेच महाराष्ट्राचा विकासदर वाढावा यासाठीही सरकार कार्यरत असते. अशातच आता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी (Farmer Scheme) नववर्षाची भेटवस्तू दिली आहे. सरकारने बळीराजासाठी नव्या योजनेची घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.



महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शेतकऱ्यांसाठी 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.०' ची (Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0) घोषणा केली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज मिळू शकणार आहे. राज्यात सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांसाठी १६,००० मेगावॅट वीज देण्यात येते. तर गेल्या दोन वर्षात सर्व फीडर सौर उर्जेत बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सरकारने नवी योजनेची घोषणा केली आहे.


व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सौर कृषी प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये मुख्य सचिव सुजाता सौनिक, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर आणि इतर अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात उंब्रठा व नारंगवाडी गावातील शेतकरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. दरम्यान, सरकारच्या या उपक्रमाकडे गेम चेंजर म्हणून पाहिले जात आहे.

Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना