Pune Solapur Highway : पुणे- सोलापूर महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात

पुणे : सोलापूर महामार्गावरी अपघाताचं सत्र सुरुच असून कंटेनरला लागलेल्या भीषण आगीनंतर आता पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, १५ ते २० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात बुधवारी पहाटेच्या वेळी झाला.



लक्झरी बस पुण्याच्या दिशेने निघाली होती. पुढे निघालेल्या ट्रकला बसने पाठीमागून धक्का दिला, आणि भीषण अपघात घडला. अपघातात एकाचा मृत्यू झाला. दौंड तालुक्यातील खडकीनजिक विसावा हॉटेलसमोर हा अपघात झाला. जखमींना भिगवणमधील दवाखान्यात तातडीने हलविण्यात आले.


या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. घटनास्थळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी अवघ्या काही तासांत कार्यवाही केली. नेमका अपघात कशामुळे झाला याची नेमकी माहिती मिळालेली नाही. अपघाताची अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. यातील जखमींच्या स्थितीवर लक्ष ठेवले जात असून, पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की, अपघात ट्रक आणि बसच्या वेगाच्या तफावतीमुळे झाला असावा.या अपघाताने पुणे-सोलापूर महामार्गावर सुरक्षा नियमांचे पालन आणि वाहतूक नियंत्रण किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणाला कलाटणी; मुलीने फिरवली बाजी निवडली पोलिसांची गाडी

पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका मधील भिगवण येते घडलेल्या अपहरण प्रकरणाचे दिवसेंदिवस नवीन पैलू उलघडत जात

कानिफनाथ यात्रेत वादाची ठिणगी; मुस्लिम व्यावसायिकांची दुकाने करणार बंद

अहिल्यानगर : राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि भटक्यांची पंढरी म्हणेजच श्री क्षेत्र मढीची कानिफनाथ

Beed: बीडमधील संतापजनक प्रकार; दहावीच्या विद्यार्थ्यांचा पेपर चक्क मंडपात

बीड: राज्यात इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरू झाली आहे. याच दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये शिक्षण

नरहरी झिरवाळ यांच्याकडून खासगी सचिवाची हकालपट्टी

मुंबई: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी

...तर एसटी तिकीट दर भरावा लागेल; तिकीट सवलतींसाठी एसटीचे नवे नियम काय?, जाणून घ्या

पुणे: महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची समोर येत आहे. एसटी प्रवासात विविध सवलत योजनांचा लाभ घेताना

एसआयआर आता २२ राज्यांमध्ये होणार; नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी 'हे' कागदपत्रे तयार ठेवा

दिल्ली: बनावट मतदार याद्या रोखण्यासाठी आणि बनावट मतदारांची नावे वगळण्यासाठी, निवडणूक आयोगाने आता देशभरात विशेष