Ujani Dam Water : भीमा नदीचे पाणी ५ जानेवारीला औज बंधाऱ्यात पोचणार

  107

सोलापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य स्त्रोतांपैकी औज बंधारा हा एक असून सध्या त्यात दहा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. महापालिकेच्या पत्रानुसार सोलापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून २६ डिसेंबर रोजी उजनी धरणातून भीमा नदीद्वारे पाणी सोडले जाणार आहे. ५ जानेवारीला ते पाणी औज बंधाऱ्यात पोचेल, असे नियोजन करण्यात आले आहे.



ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा, मकर संक्राती या सण-उत्सवामुळे सोलापूर शहरासाठी पाणी लागणार आहे. सोलापूर ते उजनी या समांतर जलवाहिनीचे काम देखील अजून पूर्ण झाले नाही. त्यासाठी आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार असून तीन महिने त्या पाइपलाइनचे प्रात्यक्षिक होणार आहे. त्यामुळे औज बंधाऱ्यातील पाणी सोलापूर शहरासाठी महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे आता उजनीतून औज बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार असून साधारणत: १५ दिवसांत ते त्याठिकाणी पोचेल. या आवर्तनासाठी उजनीतील सहा टीएमसी पाणी संपणार आहे.

Comments
Add Comment

रत्नागिरी : पोटच्या मुलाकडून आईचा सुरीने गळा कापून खून

रत्नागिरी : पोटच्या मुलानेच आपल्या आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि. २६ ऑगस्ट) पहाटे उघडकीस आली. या

Ganeshostav 2025: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावात दाखल झाले आहेत. त्यामुळे

पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांची जय्यत तयारी : प्राणप्रतिष्ठा आणि मिरवणुकांचे वेळापत्रक जाहीर

पुणे : लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी आता फक्त काही तास उरले आहेत. बुधवारी देशभरात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात

मुंबईत आंदोलन करण्यास मनोज जरांगे पाटील यांना न्यायालयाची मनाई

मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान येथे उपोषण करण्यास हायकोर्टाने मनाई केली आहे. मराठा

मुख्यमंत्री फडणवीसांच्या ओएसडीने घेतली मनोज जरांगेंची भेट, मोर्चाची तारीख पुढे ढकलण्याची शक्यता

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य

बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक, विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते भिडले

बीड : गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार