सोलापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य स्त्रोतांपैकी औज बंधारा हा एक असून सध्या त्यात दहा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. महापालिकेच्या पत्रानुसार सोलापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून २६ डिसेंबर रोजी उजनी धरणातून भीमा नदीद्वारे पाणी सोडले जाणार आहे. ५ जानेवारीला ते पाणी औज बंधाऱ्यात पोचेल, असे नियोजन करण्यात आले आहे.
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा, मकर संक्राती या सण-उत्सवामुळे सोलापूर शहरासाठी पाणी लागणार आहे. सोलापूर ते उजनी या समांतर जलवाहिनीचे काम देखील अजून पूर्ण झाले नाही. त्यासाठी आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार असून तीन महिने त्या पाइपलाइनचे प्रात्यक्षिक होणार आहे. त्यामुळे औज बंधाऱ्यातील पाणी सोलापूर शहरासाठी महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे आता उजनीतून औज बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार असून साधारणत: १५ दिवसांत ते त्याठिकाणी पोचेल. या आवर्तनासाठी उजनीतील सहा टीएमसी पाणी संपणार आहे.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…