virar Accident : चिमुकल्याच्या अंगावरुन गाडी गेली अन् थोडक्यात वाचला जीव!

मुंबई : सध्या सातत्याने हिट अँड रनच्या घटना समोर येत असताना वसईमध्येही अशीच एक घटना घडल्याचे समोर (virar Accident) आले आहे. एका चिमुकल्याच्या अंगावरुन कार गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर या प्रकारानंतर चालकही फरार झाला आहे.


आज सकाळी १० वाजून २१ मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. वसई पूर्वेच्या शिव भिम नगर, नाईकपाडा, वाळीव येथे मोकळ्या जागेत एम.एच. ०१ ई एम ३२४५ या क्रमांकाची कार एका प्रवाशाने ओला ॲपवरुन बुक करुन मागवली होती. त्याचठिकाणी राघवकुमार चव्हाण उर्फ छोटू (५) हा मुलगा खेळत असताना कारचालकाने कार बेदराकपणे चालवत पुढे मुलगा बसलेला असल्याच न बघता त्याच्या अंगावरुन गाडी चढवली आणि फरार झाला.



या घटनेनंतर स्थानिकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही ही न ऐकता तेथून निघून गेला. तसेच तेथील लोकांनी ज्याने ओला बुक केली होती त्याच्याशी संपर्क साधला. त्याने ही आपण कार चालकाला घेवून येतो असे सांगत मोबाईलच स्वीच ऑफ केल्याची माहिती तेथील नागरीकांनी दिली आहे.


दरम्यान, सध्या लहानग्याला वाळीवच्या वालवादेवी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्या हाताला, डोक्याला, छातीला दुखापत झाली असून, त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. तसेच या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Comments
Add Comment

Coastal Road : २४ तास खुला, पण 'सुरक्षित' नाही! वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान पथदिवे बंद; मुंबईकर प्रशासनावर नाराज

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाहतुकीसाठी २४ तास खुला (24 Hours Open) झाल्यानंतर त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावर प्रवास होणार अधिक आरामदायी, सहा डब्यांच्या मेट्रोची तयारी

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी! वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर आता प्रवास अधिक आरामदायी

मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकात नवा पादचारी पूल ; प्रवाशांची मोठी सोय,

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

हरमनप्रीतची विनम्रता ; विश्वचषक स्वीकारण्याआधी कोच अमोल आणि जय शाह यांच्या पाया पडली

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास रचत पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकला आहे. या ऐतिहासिक

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय ! कणकवली सिंधुदुर्गला मिळणार ८ एक्सप्रेसचा थांबा

मुंबई : कोकणकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात धावणाऱ्या आठ मेल एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग आणि कणकवली

प्रभादेवी पुलामुळे बाधित होणाऱ्या ८३ कुटुंबांना मोक्याच्या ठिकाणी घरे

एमएमआरडीए ९८.५५ कोटी रुपये खर्च करणार मुंबई  : वरळी- शिवडी उन्नत मार्गाअंतर्गंत बांधण्यात येत असलेल्या