Kalyan incident : १३ वर्षीय चिमुकली खाऊ आणायला गेली मात्र घरी परतलीच नाही

  105

कल्याण : कल्याण पूर्वमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. खाऊ आणायला गेलेली १३ वर्षीय चिमुकली घरी परतलीच नाही. पीडित मुलगी सोमवारी आईकडून २० रुपये घेऊन खाऊ आणायला गेली होती. मात्र रात्री ती घरी पोहोचली नाही. यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मंगळवारी कल्याण-पडघा रस्त्याच्या कडेला एका झुडपात मुलीचा मृतदेह सापडला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता पीडित मुलगी आईकडून २० रुपये घेऊन खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. पण सायंकाळी उशिरापर्यंत मुलगी घरी आली नाही, त्यानंतर मुलीच्या आईनं तिला शोधायला सुरुवात केली. सर्वत्र शोधाशोध करूनही मुलगी सापडत नाही, हे लक्षात आल्यानंतर महिलेनं आपल्या पतीला मुलगी सापडत नसल्याचं सांगितलं. यानंतर मुलीच्या वडीलही कामावरून तातडीनं घरी आले, दोघांनीही मुलीला शोधायला सुरुवात केली. पण मुलगी कुठेच सापडली नाही. यानंतर दाम्पत्यानं कोळशेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला.



त्यानंतर मंगळवारी कल्याण-पडघा रस्त्यावरील निर्जनस्थळी एका झुडपात मुलीचा मृतदेह आढळला आहे. हे ठिकाण मुलीच्या घरापासून १३ किलोमीटर दूर आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार करून मग तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.


मागील वर्षी शेजारी राहणाऱ्या तरुणाने माझ्या मुलीची छेड काढली होती. यावरून वाद झाल्यानंतर आरोपीनं तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती. त्यामुळे माझ्या मुलीची हत्येत त्याचाच सहभाग असावा, त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करावा, अशी विनंती मुलीच्या वडिलांनी केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत.

Comments
Add Comment

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

'आपले सरकार' पोर्टलवरील सेवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून द्याव्यात', मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना सेवा पुरवल्या जातात, या सेवांसाठी आपले सरकार हे पोर्टल

वास्तुुशास्त्रानुसार, 'या' तीन गोष्टी घरात ठेवल्यास घरात सुख-समृद्धी नांदेल आणि होईल आर्थिक भरभराट

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, घरात काही विशिष्ट

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत

Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद मोहीम, चोरीला गेलेले ८,००० मोबाईल परत मिळवून दिले

मुंबई: मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली

Ganeshotsav 2025: वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले ५२ फूटी काशी विश्वनाथ मंदिर

मुंबई: दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे