Kalyan incident : १३ वर्षीय चिमुकली खाऊ आणायला गेली मात्र घरी परतलीच नाही

कल्याण : कल्याण पूर्वमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. खाऊ आणायला गेलेली १३ वर्षीय चिमुकली घरी परतलीच नाही. पीडित मुलगी सोमवारी आईकडून २० रुपये घेऊन खाऊ आणायला गेली होती. मात्र रात्री ती घरी पोहोचली नाही. यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मंगळवारी कल्याण-पडघा रस्त्याच्या कडेला एका झुडपात मुलीचा मृतदेह सापडला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता पीडित मुलगी आईकडून २० रुपये घेऊन खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. पण सायंकाळी उशिरापर्यंत मुलगी घरी आली नाही, त्यानंतर मुलीच्या आईनं तिला शोधायला सुरुवात केली. सर्वत्र शोधाशोध करूनही मुलगी सापडत नाही, हे लक्षात आल्यानंतर महिलेनं आपल्या पतीला मुलगी सापडत नसल्याचं सांगितलं. यानंतर मुलीच्या वडीलही कामावरून तातडीनं घरी आले, दोघांनीही मुलीला शोधायला सुरुवात केली. पण मुलगी कुठेच सापडली नाही. यानंतर दाम्पत्यानं कोळशेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला.



त्यानंतर मंगळवारी कल्याण-पडघा रस्त्यावरील निर्जनस्थळी एका झुडपात मुलीचा मृतदेह आढळला आहे. हे ठिकाण मुलीच्या घरापासून १३ किलोमीटर दूर आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार करून मग तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.


मागील वर्षी शेजारी राहणाऱ्या तरुणाने माझ्या मुलीची छेड काढली होती. यावरून वाद झाल्यानंतर आरोपीनं तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती. त्यामुळे माझ्या मुलीची हत्येत त्याचाच सहभाग असावा, त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करावा, अशी विनंती मुलीच्या वडिलांनी केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Nasik News: नामांकित शाळेत बॉम्ब असल्याचा धक्कादायक मेल, शाळा प्रशासनात खळबळ!

नाशिक: नाशिक शहरातील एका नामांकित शाळेला मध्यरात्री पावणे दोन वाजता थरकाप उडवणारा मेल प्राप्त झाला. या मेलमध्ये

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला

मारुती सुझुकीने लाँच केली नवी SUV ‘व्हिक्टोरिस’; किंमत आणि दमदार फीचर्सची घोषणा!

नवी दिल्ली: भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) आपली नवीन आणि बहुप्रतिक्षित एसयूव्ही

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत