Kalyan incident : १३ वर्षीय चिमुकली खाऊ आणायला गेली मात्र घरी परतलीच नाही

कल्याण : कल्याण पूर्वमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. खाऊ आणायला गेलेली १३ वर्षीय चिमुकली घरी परतलीच नाही. पीडित मुलगी सोमवारी आईकडून २० रुपये घेऊन खाऊ आणायला गेली होती. मात्र रात्री ती घरी पोहोचली नाही. यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मंगळवारी कल्याण-पडघा रस्त्याच्या कडेला एका झुडपात मुलीचा मृतदेह सापडला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता पीडित मुलगी आईकडून २० रुपये घेऊन खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. पण सायंकाळी उशिरापर्यंत मुलगी घरी आली नाही, त्यानंतर मुलीच्या आईनं तिला शोधायला सुरुवात केली. सर्वत्र शोधाशोध करूनही मुलगी सापडत नाही, हे लक्षात आल्यानंतर महिलेनं आपल्या पतीला मुलगी सापडत नसल्याचं सांगितलं. यानंतर मुलीच्या वडीलही कामावरून तातडीनं घरी आले, दोघांनीही मुलीला शोधायला सुरुवात केली. पण मुलगी कुठेच सापडली नाही. यानंतर दाम्पत्यानं कोळशेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला.



त्यानंतर मंगळवारी कल्याण-पडघा रस्त्यावरील निर्जनस्थळी एका झुडपात मुलीचा मृतदेह आढळला आहे. हे ठिकाण मुलीच्या घरापासून १३ किलोमीटर दूर आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार करून मग तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.


मागील वर्षी शेजारी राहणाऱ्या तरुणाने माझ्या मुलीची छेड काढली होती. यावरून वाद झाल्यानंतर आरोपीनं तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती. त्यामुळे माझ्या मुलीची हत्येत त्याचाच सहभाग असावा, त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करावा, अशी विनंती मुलीच्या वडिलांनी केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत.

Comments
Add Comment

यंत्रमाग उद्योगांना वीज सवलत योजनेच्या लाभासाठी वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर नोंदणी अनिवार्य

मुंबई : राज्यातील वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार

शेतकऱ्यांसाठी मंत्री महाजनांचा मोठा निर्णय, सुपूर्द केला वर्षभराचा ‘पगार’

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मंत्री गिरीश महाजन यांनी

मुंबईत झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण (एसआरए) अंतर्गत

झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी समूह पुनर्विकास योजना राबविणार. मुंबई : मुंबईतील क्षेत्रात मोठ्या खाजगी, शासकिय,

राज्य सरकारचे ‘पुनर्वापर धोरण २०२५’ जाहीर, ४२४ शहरांना मिळणार लाभ

मुंबई : राज्यातील नागरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याच्या पुनर्वापराद्वारे चक्रीय अर्थव्यवस्थेस

महाराष्ट्र राज्याचे रत्ने व आभूषणे धोरण – २०२५ जाहीर

राज्याच्या गुंतवणूक, औद्योगिक क्षेत्रासाठी झळाळी एक लाख कोटीं रुपयांची गुंतवणूक, पाच लाख नवीन रोजगार

सबरीमला मंदिरातून तब्बल साडेचार किलो सोनं झालं 'गायब'! कसं समजलं?

द्वारपालक मूर्तीवरील ४.५४ किलो सोन्याचा हिशेब नाही; प्रायोजकाने 'टीडीबी'कडे मागितली होती परवानगी कोची: सबरीमाला