नाताळच्या दिवशी गोव्यात प्रवासी बोट बुडाली

पणजी : ऐन नाताळच्या दिवशी गोव्यातील कळंगुट समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना घेऊन जात असलेली एक बोट बुडाली. या दुर्घटनेत एका पर्यटकाचा मृत्यू झाला. इतर २० जणांना वाचवण्यात आले. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. बोटीत महाराष्ट्रातल्या खेडमधील एका कुटुंबातले १३ सदस्य होते. हे सर्व जण सुखरुप आहेत.


बोट बुडाल्यामुळे ५४ वर्षांच्या एका पर्यटकाचा मृत्यू झाला. इतरांना वाचवण्यात आले. दुर्घटनेनंतर काही जणांची तब्येत बिघडली होती, त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बोटीतील दोन जणांनी वगळता इतर सर्वांनी जीवरक्षक अंगरखा अर्थात लाईफ जॅकेट परिधान केले होते; असेही पोलिसांनी सांगितले. दोन मुले आणि दोन महिला यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतरांना प्रकृती स्थिर झाल्यानंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांमध्ये सहा आणि सात वर्षांच्या अशा दोन मुलांचा तसेच २५ आणि ५५ वर्षांच्या अशा दोन महिलांचा समावेश आहे.


बोट किनाऱ्यापासून सुमारे ६० मीटर अंतरावर समुद्रात बुडाली. बोट बुडत असल्याची जाणीव होताच कळंगुट समुद्र किनाऱ्यावर कार्यरत असलेल्या १८ जीवरक्षकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. यामुळे मोठी जीवितहानी टळली. काही दिवसांपूर्वी मुंबईत नौदलाच्या स्पीड बोटीच्या इंजिनाची चाचणी सुरू असताना अपघात झाला होता. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया जवळ नीलकमल नावाच्या फेरीबोटीला स्पीड बोटची धडक बसली. या अपघातात १५ पर्यटकांचा मृत्यू झाला होता.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे