Nitesh Rane : समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या बांगलादेशींचा बंदोबस्त करणार; पदभार स्वीकारताच मंत्री नितेश राणेंचा इशारा

मुंबई : मत्स्य आणि बंदर खात्याचा पदभार मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी स्वीकारला. या दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. २६/११ नंतर आपण बरीच खबरदारी घेतली. समुद्री किनाऱ्यावर राहणाऱ्या बांगलादेशींचाही बंदोबस्त करणार, असा इशारा मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला आहे.


मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मंगळवार, दि. २४ डिसेंबर रोजी मंत्रालयात आपल्या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मत्स्य आणि बंदर खात्यातीतील विविध प्रश्नांवर भाष्य करत उपरोक्त इशारा दिला आहे. समुद्र किनारी रोहिंग्यो आणि बांगलादेशी यांचे वास्तव्य सहन करणार नाही, असेही ते म्हणाले.


मत्स्य आणि बंदरे दोन्ही खात्यांमध्ये काय सुरु आहे? आपण कुठून सुरुवात करायची? याचा मी आढावा घेतल्याचे नीतेश राणे यांनी सांगितले. माझ्या काही अपेक्षा किंवा विकासाच्या अनुषंगाने बदल करण्यासाठी काय करता येईल, यासाठी काही सूचना दिल्या, असेही नीतेश राणे यांनी सांगितले.



नितेश राणे यांनी पुढे बोलताना, रोहींग्यो आणि बांगलादेशींना इशारा दिला. सागरी सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. २६/११ च्या हल्ल्यानंतर आपण बरीच खबरदारी घेतली. मात्र आताही काही जिहादी लोकांच्या अॅक्टिव्हिटी सागरी किनाऱ्यावर काम करत असतात, असा दावा नितेश राणे यांनी केला. त्यामुळे त्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नितेश राणे म्हणाले.


रोहिंग्यो आणि बांगलादेशी यांचे वास्तव्य सहन करणार नाही, त्यांना सोडणार नाही. त्यांची सफाई मोहीम हाती घेऊ. समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या बांगलादेशींचाही बंदोबस्त करणार, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला.

Comments
Add Comment

राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध

मुंबई : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग

महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी

डिजिटल गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ, सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमधून मुंबईकरांची १२७ कोटींची लूट

मुंंबई: सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमुळे मुंबईकरांना १२७ कोटी रुपयांना लुबाडले असल्याचा आकडा पोलीस तपासातून

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त प्रवाशांच्या

ज्येष्ठांचा सन्मान करून साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांप्रती बांधिलकी जपणारा

मुंबईतील पाणी कपात घेतली मागे, काय आहे कारण..

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रस्तावित आहे.