Weather : वर्षाअखेरीस राज्यात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई: राज्यातील कडाक्याचा थंडीचा जोर कमी होत चालला असून वर्षाच्या शेवटी राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याच्या शक्यता आहे. पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा २ ते ४ अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.


हवामान विभागाच्या माहितीनुसार मराठवाडा ते मध्य महाराष्ट्रात २६ ते २८ डिसेंबरदरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच वर्षाच्या अखेरीस वादळी वाऱ्यासह गारपीटही होणार असल्याचीही शक्यता आहे.



या ठिकाणी कोसळणार पावसाच्या सरी


मध्य तसेच पश्चिम भारतात पुढील २४ तासांत तापमान वाढण्यास सुरूवात होणार आहे. त्यानुसार २६ आणि २७ डिसेंबरला पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याची तीव्रता मध्य तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात असणार आहे.


२६ डिसेंबरला हवामान विभागाने धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे तर २७ डिसेंबरला नाशिक, पुणे, जळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, अमरावती, नंदुरबार, बुलढाणा, वाशिम, अकोला या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे.

Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग