Weather : वर्षाअखेरीस राज्यात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई: राज्यातील कडाक्याचा थंडीचा जोर कमी होत चालला असून वर्षाच्या शेवटी राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याच्या शक्यता आहे. पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा २ ते ४ अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.


हवामान विभागाच्या माहितीनुसार मराठवाडा ते मध्य महाराष्ट्रात २६ ते २८ डिसेंबरदरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच वर्षाच्या अखेरीस वादळी वाऱ्यासह गारपीटही होणार असल्याचीही शक्यता आहे.



या ठिकाणी कोसळणार पावसाच्या सरी


मध्य तसेच पश्चिम भारतात पुढील २४ तासांत तापमान वाढण्यास सुरूवात होणार आहे. त्यानुसार २६ आणि २७ डिसेंबरला पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याची तीव्रता मध्य तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात असणार आहे.


२६ डिसेंबरला हवामान विभागाने धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे तर २७ डिसेंबरला नाशिक, पुणे, जळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, अमरावती, नंदुरबार, बुलढाणा, वाशिम, अकोला या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे.

Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे