Weather : वर्षाअखेरीस राज्यात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई: राज्यातील कडाक्याचा थंडीचा जोर कमी होत चालला असून वर्षाच्या शेवटी राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याच्या शक्यता आहे. पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा २ ते ४ अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.


हवामान विभागाच्या माहितीनुसार मराठवाडा ते मध्य महाराष्ट्रात २६ ते २८ डिसेंबरदरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच वर्षाच्या अखेरीस वादळी वाऱ्यासह गारपीटही होणार असल्याचीही शक्यता आहे.



या ठिकाणी कोसळणार पावसाच्या सरी


मध्य तसेच पश्चिम भारतात पुढील २४ तासांत तापमान वाढण्यास सुरूवात होणार आहे. त्यानुसार २६ आणि २७ डिसेंबरला पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याची तीव्रता मध्य तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात असणार आहे.


२६ डिसेंबरला हवामान विभागाने धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे तर २७ डिसेंबरला नाशिक, पुणे, जळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, अमरावती, नंदुरबार, बुलढाणा, वाशिम, अकोला या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये